जलसंधारण मराठी निबंध ! Water Conservation Essay in Marathi|

जलसंधारण किंवा जलसंवर्धन हा मराठी निबंध (Water Conservation Essay in Marathi) माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक विद्यालयात असताना लिहावा लागतो.

जलसंधारण हा विषय खूप व्यापक आहे. प्रत्येक प्रांतात जलसंधारण हे वेगवेगळ्या स्तरावर असू शकते. चला तर मग पाहूयात, कसा लिहू शकतो जलसंधारण हा मराठी निबंध!

जलसंधारण निबंध ! Jal Sandharan Marathi Nibandh |

पाणी म्हणजे अर्थातच जीवन! रोज वापरण्यात येणारे पाणी व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असेल परंतु त्याचा सुयोग्य वापर करणे आज कर्तव्य बनून गेले आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत एक व्यक्ती जेवढे पाणी वापरतो, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

दैनंदिन कामात पाण्याचा वापर वाढत चाललेला आहे. पाणी सर्व कामांसाठी गरजेचे देखील आहे पण त्याचा अपव्यय होत असल्यास काय करावे लागेल, याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. आज लोकसंख्या आणि जलप्रदूषण या समस्या भेडसावत असल्याने पाण्याचा नियंत्रित वापर ही काळाची गरज होऊन बसली आहे.

प्रत्येक शासकीय यंत्रणा ही जलसंधारण बाबतीत विचार करतेच आणि त्याबाबत धोरण आणि योजना ठरवत असते. लोकसंख्या, उपलब्ध जलस्त्रोत आणि त्याचे नियोजन व पुरवठा या सर्व गोष्टी सरकारला स्वतःच्या धोरणात ठरवाव्या लागतात.

पाऊस ज्या क्षेत्रात जास्त पडतो तेथे जल प्रकल्प उभारणे आणि जेथे दुष्काळ किंवा पाणीटंचाई असते, त्या विभागात पाणी पुरवठा करणे अशा धोरणांनी जलसंधारण यशस्वी ठरत असते. धरणांमुळे शेतीविकास शक्य झाला. आज शेतीवर उपजीविका करून लोक एक चांगले आयुष्य जगत आहेत.

मागील दोन दशकांत भारत देशात झालेले प्रयत्न उल्लेखनीय असे आहेत. भारतात तरी वीजनिर्मिती आणि पाणी पुरवठा योजना योग्य प्रकारे अंमलात आणल्या जात आहेत. मोठ्या नद्यांवर उभारलेले वीजप्रकल्प आणि धरणे यांमार्फत त्या संपूर्ण राज्यातील वीज समस्या टाळली गेली आहे.

जलसंधारण किंवा जलनियोजन करण्यासाठी पाणी बारा महिने उपलब्ध असणे आवश्यक आहे. सध्या निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यावरील कारणे शोधताना आपण लोकसंख्या देखील विचारात घेतली पाहिजे. जंगले का तोडली जात आहेत? पाणी का दूषित बनत चालले आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

जलप्रदूषण आणि नियोजनातील इतर अडथळे दूर सारून जलसंधारण व्यवस्थितरीत्या राबवता येईल. कोणत्याही राज्याच्या विकासात उद्योगधंदे, शेती, आणि विज्ञान – तंत्रज्ञान यांची मोलाची साथ मिळत असते. अशा उत्पन्नाच्या साधनांना पाणी उपलब्ध करून देणे यासाठी जलसंधारण करणे आवश्यक आहे.

जलसंधारण करताना भौगोलिक आधार लक्षात घ्यावा लागतो. निसर्गनिर्मित सरोवरे, तळी, नाले यांचाही विचार करावा लागतो कारण बारा महिने पाणी पुरवण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो. अशा प्रदेशात पाणी अडवा – पाणी जिरवा, शेततळे, डोंगरांवर चऱ्या खोदणे, असे प्रकल्प उभारल्यास तेथील भू-क्षेत्र आणखी विकसित होऊ शकते.

भूगर्भातील पाण्यामुळे आपण नेहमीच उत्तम शेती करू शकलो आहे. त्यासाठी त्या क्षेत्रात पाणी जिरवणे खूप आवश्यक ठरते. त्यासाठी जलसंधारण करताना पाणी जमिनीत जिरवणे, पावसाळ्यात पाणी जास्त वाया जाऊ न देता ते साठवणे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या
जातात.

भूगर्भात जलसाठा वाढवणे, पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करणे, पाणी पुरवठा, पाणी नियोजन, पाणी प्रदूषण प्रतिबंध अशा काही संकल्पना जलसंधारण करताना आवश्यक ठरतात. सरकार अशा योजना आणि प्रकल्प राबवत असते परंतु त्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि सहयोग आवश्यक आहे.

तुम्हाला जलसंधारण मराठी निबंध ( Water Conservation Essay in Marathi ) निबंध कसा वाटला ? नक्की कमेंट करून कळवा… धन्यवाद!

4 thoughts on “जलसंधारण मराठी निबंध ! Water Conservation Essay in Marathi|”

Leave a Comment