व्यक्तिविशेष Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Tue, 25 Jan 2022 05:07:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 व्यक्तिविशेष Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 रामकृष्ण परमहंस मराठी माहिती | Ramkrushna Paramhans Marathi Mahiti | https://dailymarathinews.com/ramkrushna-paramhans-marathi-mahiti/ https://dailymarathinews.com/ramkrushna-paramhans-marathi-mahiti/#respond Sat, 13 Mar 2021 01:18:26 +0000 https://dailymarathinews.com/?p=2009 प्रस्तुत लेख हा गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक, तांत्रिक, वैष्णव, आणि भक्तिमय जीवनाचा परिचय करून देतो. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या पूर्ण जीवनात भक्ती, ज्ञान आणि ...

Read moreरामकृष्ण परमहंस मराठी माहिती | Ramkrushna Paramhans Marathi Mahiti |

The post रामकृष्ण परमहंस मराठी माहिती | Ramkrushna Paramhans Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक, तांत्रिक, वैष्णव, आणि भक्तिमय जीवनाचा परिचय करून देतो. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या पूर्ण जीवनात भक्ती, ज्ञान आणि धर्म प्रसार केला. चला तर मग पाहुयात कसे होते रामकृष्ण परमहंस (Ramkrushna Paramhans) यांचे गूढवादी जीवन!

रामकृष्ण परमहंस मराठी माहिती संक्षिप्त | Ramkrushna Paramhans Information In Marathi In Short |

रामकृष्ण परमहंस यांचे खरे नाव गदाधर चट्टोपाध्याय होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८३६ रोजी कामारपुकुर, पश्चिम बंगाल येथे एका गरीब वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. ते एकोणिसाव्या शतकातील एक गूढ वादी, आध्यात्मिक सत्पुरुष आणि गुरु होते.

रामकृष्ण परमहंस खऱ्या अर्थाने जगविख्यात बनले ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे गुरू म्हणून! परमहंस देव यांना त्यांचे सर्व शिष्य आणि आप्तेष्ट हे ईश्वरी अवतार मानत असत. सुरुवातीच्या जीवनात रामकृष्ण हे काली भक्त म्हणून प्रसिद्ध होते.

भक्ती आणि गूढता यामध्ये रामकृष्ण पारंगत होतेच परंतु ती केवळ भावना होती. त्यांना देवी काली खरोखर दर्शन देत असे. ऊर्जा आणि भावना यांचा खऱ्या अर्थाने जम बसवण्यात ते कुशल बनले होते. तंत्र आणि वैष्णव भक्ती यांत त्यांना परमानंद जाणवत होता.

परंतु एक दिवस तोताराम या सत्य जाणणाऱ्या महापुरुषाने रामकृष्ण यांना सत्य आणि कल्पना यातील फरक जाणवून दिला त्या दिवसानंतर रामकृष्ण खऱ्या अर्थाने धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभवाला प्राप्त झाले.

रामकृष्ण हे अशिक्षित असल्याने त्यांची बोलीभाषा ग्रामीण होती परंतु आध्यात्मिक अनुभवामुळे त्यांची वाणी सुमधुर आणि रसाळ होती. त्यांच्या कथांचा आणि व्याख्यानाचा बंगाली जनतेवर विलक्षण प्रभाव दिसून येत होता. अनेक तार्किक आणि बौद्धिक लोकांना देखील ज्ञान देण्यात रामकृष्ण यशस्वी ठरले.

रामकृष्ण परमहंस यांचे बालपण – Ramkrushna Paramhans Childhood

गदाधर चटोपाध्याय म्हणजेच रामकृष्ण परमहंस यांच्या वडिलांचे नाव क्षुदिराम चट्टोपाध्याय (काही ठिकाणी ‘खुदीराम’ असा उल्लेख आहे.) आणि आईचे नाव चंद्रमणीदेवी असे होते. रामकृष्ण यांना लहानपणी सर्वजण गदा या नावाने ओळखत. शिक्षणात आणि तार्किक कौशल्यात त्यांना विशेष रस नव्हता. मातीच्या मूर्ती बनवणे, संगीत आणि कथा सांगणे यामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते.

सत्पुरुष आणि संन्यासी यांच्याकडून ते लहानपणी कथा ऐकत असत आणि कथा सांगतही असत. पुरीच्या मार्गावर असताना त्यांच्या कामारपुकुर गावात जर कोणी संन्यासी, विद्वान ब्राह्मण जर विसाव्यासाठी थांबले तर रामकृष्ण त्यांची सेवा करत असत. त्यांचा तर्कशास्त्र व धार्मिक संवाद जाणून घेत असत.

वडिलांच्या निधनानंतर रामकृष्ण यांचे थोरले बंधू रामकुमार यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. रामकृष्ण हे आईच्या सानिध्यात राहू लागले. घरातील कामे, देवपूजा आणि आईची सेवा करू लागले. त्यानंतर काही काळाने रामकुमार हे कोलकात्यात पुरोहित बनले. भावाच्या सहाय्यतेसाठी रामकृष्ण १८५२ मध्ये कोलकात्याला गेले.

दक्षिणेश्वर येथील पौरोहित्य –

कोलकात्यात अस्पृश्य कैवर्त समाजातील एका जमीनदार घराण्यातील राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले. रामकुमार यांची मदत म्हणून रामकृष्ण यांनी मूर्तीच्या साजसज्जेचे दायित्व स्वीकारले. १८५६ साली रामकुमार यांच्या मृत्यूनंतर रामकृष्ण यांनी त्यांची जागा चालवली. त्यानंतर मंदिरातच ते राहू लागले.

पत्नी शारदादेवी – Wife Sharada Devi

रामकृष्ण यांच्या अति भावतन्मयतेमुळे सर्व लोक त्यांना वेडे समजू लागले होते. त्यांचा विवाह लावून द्यावा अशी त्यांच्या आईची इच्छा होती. रामकृष्ण परमहंस यांनी विवाहाला विरोध केला नाही. कामारपुकुर गावाजवळील जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांची मुलगी शारदादेवी यांच्याशी रामकृष्ण परमहंस यांचा विवाह करण्यात आला.

भैरवी ब्राह्मणी व तंत्रसाधना –
Bhairavi Brahmani and Tantra Sadhana

१८६१ साली भैरवी ब्राह्मणी यांच्याशी रामकृष्ण यांची भेट झाली. भावनिक आणि अध्यात्मिक शक्तीमुळे रामकृष्ण यांचे शरीर आणि मन असह्य वेदना सहन करत होते. त्या वेदनेचा अंत करण्यासाठी भैरवी ब्राह्मणी यांनी रामकृष्ण यांस तंत्रसाधना करण्यास सांगितली. त्या साधनेमुळे रामकृष्ण बरे होत गेले.

तंत्र आणि मंत्र साधना पूर्ण करण्यासाठी रामकृष्ण यांना दोन वर्षे एवढा कालावधी लागला. रामकृष्ण हे भैरवी ब्राह्मणी यांस मातृभावनेने पुजत असत. तर भैरवी या रामकृष्ण यांस अवतार मानत असत. भैरवी यांनी त्यानंतर कुमारी पूजेची दीक्षा दिली ज्यामध्ये कुमारिकेला देवी समजून तिची पूजा करावी लागते.

वैष्णव भक्ती साधना –
Vaishnav Bhakti Sadhana

रामकृष्ण हे कमालीचे भावतन्मय व्यक्ती होते. कालीपूजा, रामभक्ती, कृष्णभक्ती या सर्व देवतांच्या पुजेमध्ये त्यांनी दास्यपद स्वीकारले होते. देवी कालीला ते विश्वजननी, स्वतःची आई मानत असत. त्यांनी रामभक्ती करताना स्वतःला हनुमान आणि कृष्णभक्तीवेळी स्वतःला राधा मानून भक्ती केली.

त्यांची भावना एवढी प्रबळ होती की ऊर्जेच्या स्वरूपात त्यांच्यापुढे सर्व काही प्रकट होत असे. देवी कालीचे दर्शन, वैष्णव भक्ती, कृष्ण आणि रामभक्ती या सर्वांमध्ये निर्माण झालेली तल्लीनता हे सर्वकाही त्यामुळेच घडत होते.

सत्य / परमार्थ प्राप्ती –

१८६४ साली तोतापुरी या वेदान्तिक संन्याशाकडून रामकृष्णांनी संन्यास घेतला. तोतापुरी हे आध्यात्मिक उन्नती साधलेले सिद्ध पुरुष होते. त्यांनी रामकृष्ण यांना अद्बैत तत्त्वज्ञान शिकवले. तोतापुरी यांच्याच मार्गदर्शनाखाली रामकृष्ण यांनी निर्विकल्प समाधी ज्ञान आणि अनुभव प्राप्त केला.

रामकृष्ण यांना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांबद्दल देखील कमालीचा आदर होता. सर्व धर्म समभाव त्यांच्या अंगी होता. जगातील सगळे धर्म म्हणजे नद्याच आहेत ज्या शेवटी सागरास म्हणजे अद्वैत शक्तीस मिळतात, असा त्यांचा समज होता.

रामकृष्ण यांनी १६ ऑगस्ट १८८६ रोजी महासमाधी घेतली. त्यांच्या महासमाधीनंतर त्यांचे परमशिष्य स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेद्वारे त्यांचे धर्मकार्य सुरू ठेवले. रामकृष्ण यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचे काम ही संस्था करते.

रामकृष्ण परमहंस मराठी माहिती (Ramkrushna Paramhans Marathi Mahiti) हा लेख तुम्हाला कसा वाटला? सर्व माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post रामकृष्ण परमहंस मराठी माहिती | Ramkrushna Paramhans Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ramkrushna-paramhans-marathi-mahiti/feed/ 0 2009
छत्रपती शिवाजी महाराज भाषण | Shivaji Maharaj Marathi Bhashan | https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-marathi-bhashan/ https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-marathi-bhashan/#respond Sun, 31 Jan 2021 23:35:32 +0000 https://dailymarathinews.com/?p=1952 प्रस्तुत लेखात छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषण (Chhatrapati Shivaji Maharaj Bhashan) देण्यात आलेले आहे. त्या भाषणाचा उपयोग तुम्ही शाळेत तसेच वक्तृत्व स्पर्धेत करू शकता. ...

Read moreछत्रपती शिवाजी महाराज भाषण | Shivaji Maharaj Marathi Bhashan |

The post छत्रपती शिवाजी महाराज भाषण | Shivaji Maharaj Marathi Bhashan | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषण (Chhatrapati Shivaji Maharaj Bhashan) देण्यात आलेले आहे. त्या भाषणाचा उपयोग तुम्ही शाळेत तसेच वक्तृत्व स्पर्धेत करू शकता.

छत्रपती शिवाजी महाराज या भाषणाची सुरुवात आणि शेवट समर्पक असावा, तसेच त्यांच्या जीवनाचे वर्णन वास्तविक आणि प्रासंगिक करावयाचे असते. चला तर मग पाहुयात कसे असावे/करावे भाषण!

राजा शिवछत्रपती भाषण | Chhatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi |

शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे ||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||

समर्थांच्या या ओळी शिवरायांची महती स्पष्ट करतात. त्यांच्या कर्तृत्वाची आणि दातृत्वाची उंची दाखवून देतात. आज साडे तीन शतके व्यतित झाल्यानंतरही छत्रपतींचे स्मरण तिळमात्रही कमी होत नाहीये. त्यांच्या जीवनावर भाषण करणे म्हणजे माझेच नाही तर ते भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांचे देखील सौभाग्य आहे.

युगपुरुष, स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, छत्रपती अशा एक ना अनेक उपाधी ज्या महापुरुषाला प्राप्त झाल्या आहेत ते दुसरे तिसरे कोणीही नसून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले आहेत. शून्यातून स्वराज्य निर्मिती करणारे शिवराय हे संपूर्ण देशासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श आणि प्रजादक्ष राजा मानले गेले आहेत.

अशा या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वाचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते.

शिवरायांचे बालपण राजमाता जिजाऊ यांच्या सानिध्यात गेले. शहाजीराजे स्वतः सरदार असल्याने त्यांचे साथीदार ही तेवढेच कुशल, हुशार आणि लढाऊ वृत्तीचे होते. राजमाता जिजाऊ आणि इतर विश्वासू कर्तबगार मंडळी यांचे सानिध्य सतत शिवरायांना लाभत असल्याने त्यांचे व्यक्तित्व हे चांगल्या संस्कारांनी भारले गेले.

राजमाता जिजाऊ स्वतः शिवरायांना रामायण, महाभारत तसेच इतर वीर पुरुषांच्या कथा सांगत असत. त्यानुसार त्यांचे विचारही त्या दिशेने पराक्रमी बनण्याचे पक्के होत गेले. शहाजीराजे सरदार असल्याने सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत. अशा सर्व शिकवणीमुळे बाल शिवाजी हे मोठेपणी छत्रपती बनू शकले.

आदिलशाही, निजामशाही, आणि मुघल या सत्तांविरोधात शिवरायांनी आपली मोहीम राबवली. मावळे, विश्वासू कर्तबगार साथीदार, आणि आई भवानीचा आशीर्वाद सोबत घेऊन या सत्तांविरोधात जबरदस्त लढा दिला. सुरुवातीला पुणे प्रांत जिंकत त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न हळूहळू सत्यात उतरवायला सुरुवात केली.

अफजलखान स्वराज्यावर चालून आलेला असताना त्याचा बंदोबस्त अत्यंत युक्तीने करून शिवरायांनी आपली बुद्धीची चुणूक दाखवली. त्याप्रमाणे “शायीस्ते खानाची बोटे कापणे”, “आग्र्याहून सुटका”, “पुरंदरचा तह” अशा प्रसंगांत शिवराय किती पराक्रमी, संयमी, आणि अढळ होते हे दिसून येते.

स्वराज्य निर्मितीच्या स्वप्नात अनेक मावळे शिलेदारांनी शिवरायांसाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. आदिलशाही, निजामशाही, आणि मुघल या तिन्ही सत्तांनी शिवरायांचे अस्तित्व मान्य केले होते. आता रयतेचा विचार करून त्यांचे हित जपणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले. इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला.

राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वराज्याचे स्वतंत्र चलन सुरू केले. “प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे.” असा अर्थ असणारे राजमुद्रेवरील संस्कृत सुभाषित खालीलप्रमाणे,

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

शिवरायांनी आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. स्वराज्याचा पहिला छत्रपती म्हणून शिवराय हेच रयतेकडून सर्वमान्य झाले होते. शिवरायांची गाथा संपूर्ण भारत वर्षात दुमदुमत होती. अशा या वीर पुरुषाची प्राणज्योत अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी मालवली.

संपूर्ण जीवन एक धगधगती ज्वाला आणि संघर्ष बनवणारा, स्वराज्य निर्मितीसाठी आणि लोकहितासाठी स्वतःचे जीवन पणाला लावणारा असा नरवीर, पराक्रमी, राष्ट्रपुरुष छत्रपती महाराष्ट्र भूमीत जन्माला आला आणि मातृभूमी धन्य करून गेला. असा राजा पुन्हा होणे नाही. राजा शिवछत्रपती एकच होता, एकच आहे आणि एकच राहील. अशा या युगपुरुषाचे संस्मरण अनंत काळापर्यंत होत राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!

शिवरायांचे जीवन ( Life Of Shivaji Maharaj ) शाब्दिक स्वरूपात व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज भाषण (Shivaji Maharaj Bhashan) कसे वाटले, याबद्दल नक्की कळवा.

The post छत्रपती शिवाजी महाराज भाषण | Shivaji Maharaj Marathi Bhashan | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-marathi-bhashan/feed/ 0 1952
स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi | https://dailymarathinews.com/swami-vivekanand-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/swami-vivekanand-information-in-marathi/#comments Mon, 11 Jan 2021 00:34:24 +0000 https://dailymarathinews.com/?p=1922 प्रस्तुत लेखात स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information in Marathi) देण्यात आलेली आहे. माहितीचा आधार हा आपले ज्ञान वाढवण्यासाठी असतो. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे ...

Read moreस्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi |

The post स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information in Marathi) देण्यात आलेली आहे. माहितीचा आधार हा आपले ज्ञान वाढवण्यासाठी असतो. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे जीवन माहीत करून घेणे आपल्या ज्ञानात आणि आयुष्याच्या वाटचालीत उपयुक्त ठरेल अशी आशा करूया…

स्वामी विवेकानंद यांचे जीवन (Swami Vivekanand Life) आपण फक्त त्यांनी केलेल्या कर्तृत्वावर जाणू शकतो. अशा कर्तुत्वाची झेप घेण्याची ऊर्मी सर्व मानव जातीत येण्यासाठी सर्वांना स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट (Swami Vivekanand Biography) माहिती असणे आवश्यक आहे.

स्वामी विवेकानंद – माहिती | Swami Vivekanand Information In Marathi |

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण, कार्य आणि अध्यात्मिक उन्नती अशा काही पैलुंमध्ये त्यांचे जीवन विस्तारित करता येईल. संपूर्ण जीवनपट मांडताना काही महत्त्वपूर्ण घटनांचा आणि कर्तुत्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

स्वामी विवेकानंद जीवनपट संक्षिप्त (Swami Vivekanand Biography In Marathi)

स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला त्यांचे निधन ४ जुलै १९०२ रोजी झाले. स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते.

साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेले होते. त्यांचा सर्व धर्मीय अभ्यास होता. सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती.

रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मीय संदेश प्रसारित करण्यासाठी “रामकृष्ण मिशन” स्थापित करण्यात आली. रामकृष्ण मिशनतर्फे त्यांनी धर्मप्रसार केला आणि अध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले.

स्वामी विवेकानंद यांचे बालपण | Swami Vivekanand Early Life |

विवेकानंदांचा जन्म कोलकातामध्ये सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ रोजी, सोमवारी (पौष कृष्ण सप्तमी) झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात अ‍ॅटर्नी (वकील) होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विषयांशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी यादेखील धार्मिक वृत्तीच्या होत्या.

स्वामी विवेकानंद हे संगीतात देखील विशेष रस घेत असत. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे शिकले होते. त्यामध्ये गायन आणि वादन या दोन्हींचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त शारीरिक सुदृढतेकडे त्यांचे विशेष लक्ष असे. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती या सर्व क्षेत्रांत ते पारंगत होते.

तर्कसंगत विचार आणि कृती यावर त्यांचा लहानपणापासून विशेष भर होता. अंधश्रध्दा, जातीव्यवस्था, धर्मांध प्रथा यांच्या विरोधात नेहमी त्यांचे प्रश्न उपस्थित असत. लहान वयातच ते लिखाण आणि वाचन शिकले होते. त्यांची वाचनाची गती खूपच अफाट होती.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण ( Swami Vivekanand Education )

स्वामी विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये झाले.

त्यांनी १८७९ मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतला.

त्या शिक्षणानंतर त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तेथे तर्कशास्त्र, इतिहास, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान इ. विषय हाताळले.

त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८८१ साली फाइन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी बी.ए. चे शिक्षण १८८४ साली पूर्ण केले.

स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान | Swami Vivekanand Philosophy |

स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान तर होतेच परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांना सवय होती. त्यांचे शिक्षण पूर्ण होताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी अनेक तत्त्वज्ञानी अभ्यासले.

यामध्ये बारूच स्पिनोझा, इमॅन्युएल कान्ट, डेव्हिड ह्यूम, गोत्तिलेब फित्शे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इ. विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचा समावेश होता.

पाश्चात्य तत्त्वज्ञानी अभ्यासताना त्यांना ज्ञानाची जी भूक लागली होती ती आत्मिक होती. सर्व तत्वज्ञान फक्त बौद्धिक विश्लेषण होते. त्यानंतर त्यांनी बंगाली आणि प्राचीन संस्कृत साहित्य अभ्यासायला सुरुवात केली.

शिक्षण आणि ज्ञानाची आस पाहून त्यांना सर्वजण बुद्धिमान म्हणून ओळखत होतेच शिवाय त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभलेला व्यक्ती म्हणजेच “शृतिधर” म्हणून देखील ओळखू लागले.

तार्किक आणि बौद्धिक ज्ञानाने जीवनाच्या अनुभवात काही फरक पडत नाहीये अशी मनोधारणा झाल्याने त्यांनी आत्मिक आणि अध्यात्मिक प्रवास सुरू केला तो म्हणजे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मदतीने! स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान आणि विचार हे सर्व त्यांच्या आत्मिक अनुभवातून प्रकट झालेले आहेत.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस | Swami Vivekanand and Ramkrushna Paramhans |

स्वामी विवेकानंद हे सर्व प्रकारच्या ज्ञानाने व्यापलेले होते. त्यांना आता आत्मिक अनुभवाची ओढ लागली होती. “देव आहे का?” या एका प्रश्नाने त्यांना एवढे ग्रसित केले होते की त्याचे उत्तर देणारा समर्पक व्यक्ती किंवा गुरु त्यांना सापडत नव्हता.

ब्रह्मा समाजाचे नेते महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या संपर्कात विवेकानंद काही काळ होते. त्यांना कदाचित उत्तर माहीत असेल म्हणून त्यांच्याकडे विवेकानंद गेले परंतु महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर हे देखील विवेकानंदांना आत्मिक अनुभव प्राप्ती मिळवून देण्यात असमर्थ होते.

प्रश्नाच्या शंकेने आणि गुरूच्या शोधात असताना विवेकानंद हे एक दिवस रामकृष्ण परमहंस यांना भेटले. सर्वप्रथम विवेकानंद यांनी वाटले की आपण प्रश्न विचारू आणि परमहंस गुरु काहीतरी उत्तर देतील पण तसे झालेच नाही.

विवेकानंद म्हटले, “देव आहे का?”, रामकृष्ण उठले आणि सरळ विवेकानंद यांना म्हटले “आत्ताच जाणून घेणार का?” आणि असा साक्षात्कार दिला की विवेकानंद सफल झाल्यासारखे अनुभवू लागले.

त्यानंतर खऱ्या आत्म साक्षात्कारी प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंस यांनादेखील ज्ञान आणि धर्म प्रसार करण्यासाठी विवेकानंदांसारखा एक बुद्धिमान, अद्भुत आणि धाडसी व्यक्ती हवा होता, तो त्यांना मिळाला होता. इथून पुढे अध्यात्मिक साधना सुरू झाली होती. परमहंस देव यांनी स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला होता.

परमहंस यांच्या अध्यात्मिक सहवासामुळे विवेकानंद उन्नत होत होते. त्यांच्यासह अन्य तरुण साधकांनी गुरु रामकृष्ण यांच्या समवेत काशीपूरच्या उद्यानात साधना केली आणि आत्मिक अनुभव प्राप्त केला.

स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक कार्य | Swami Vivekanand Spiritual Work |

गुरु रामकृष्ण परमहंस उत्तर आयुष्यात कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण यांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली.

कोलकात्याजवळ वराहनगर भागात गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने या मठाची स्थापना सुरुवातीला एका पडक्या इमारतीत झाली. विवेकानंदांनी रामकृष्ण गुरूंनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्म व अस्थी – कलश त्या मठात नेऊन ठेवल्या. गुरु रामकृष्ण यांचे अनुयायी व भक्‍त तेथे राहू लागले.

स्वामी विवेकानंद यांचे भारतभ्रमण | Swami Vivekanand Bharat Bhraman |

रामकृष्ण मिशनचे कार्य आणि धर्मप्रसार हा उद्देश्य ठेवून विवेकानंद हे भारतभ्रमण करण्यासाठी बाहेर पडले. भारताची धार्मिक उदासीनता पाहून त्यांचे मन खिन्न झाले. त्यानंतर भारतीय तरुण जर अध्यात्मिक बनू शकला तर संपूर्ण परिस्थिती बदलू शकते असा त्यांना विश्वास होता.

तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्म जागृती अशी अनेक कार्ये त्यांनी स्वीकारली. अत्यंत कमी वयात आत्मज्ञान झाल्याने शारीरिक साथ त्यांना मिळत नव्हती. त्यांनी त्वरित भारताबाहेर देखील जगभरात प्रवास सुरू केला. अद्वैत ब्रम्हज्ञान हेच मानवी जीवनाचे अत्युच्च शिखर आहे असा संदेश सर्वत्र पोहचवणे हे एकच उद्दिष्ट स्वामी विवेकानंद यांच्यासमोर होते.

शिकागो येथील सर्वधर्म परिषद आणि जगभरात धर्मप्रसार |

शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट, शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी सर्व धर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद उपस्थित होते आणि हिंदू वेदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व करीत होते.

स्वामीजींनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणाची सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या लोकांनी जवळजवळ दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला.

या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे आहेत पण जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर काही काळ अमेरिकेतील वास्तव्यात आपल्या विचारांनी आणि व्याख्यानांनी त्यांनी अमेरिकेतील पत्रकार आणि जाणकार यांचे लक्ष वेधून घेतले. तेथील वृत्तपत्रांनी स्वामीजींच वर्णन “भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी”(Cyclonic Monk From India) असे केले होते.

वेदान्त आणि योग यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर युरोपीय देशांमध्येसुद्धा व्याख्याने दिली. १८९५ मध्ये अतिव्यस्ततेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यांनी त्यानंतर योग वर्ग देण्यास सुरुवात केली. यावेळी भगिनी निवेदिता ही त्यांची शिष्य बनली.

स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू | Swami Vivekananda Death |

स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात अध्यात्मिक शिखर गाठले होते. मानसिक आणि आत्मिक दिशेने जीवन गती झाल्याने शारीरिक स्वास्थ्य मात्र त्यांनी गमावले.

४ जुलै १९०२ रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली. ते अत्यंत अल्प म्हणजे फक्त ३९ वर्षे जगले. इतक्या कमी काळात त्यांनी अफाट धर्म कार्य केले. त्यांचे कार्य हे येणाऱ्या सर्व पिढ्या सदैव लक्षात ठेवतील. कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभे आहे.

धार्मिक वास्तू आणि आश्रम – Swami Vivekanand Ashram |

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या धर्मकार्यात अनेक आश्रमांची स्थापना केली ज्याद्वारे त्यांना रामकृष्ण मिशनचे कार्य पूर्ण करता येईल. त्यामध्ये रामकृष्ण मठ, बेलूर मठ, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील वेदांत सोसायटी, कॅलिफोर्निया मधील शांती आश्रम आणि भारतातील अद्वैत आश्रम यांचा समावेश होतो.

स्वामी विवेकानंद – मराठी माहिती थोडक्यात !
Swami Vivekanand Information in Marathi in short |

स्वामी विवेकानंद आयुष्य सार – Life of Swami Vivekanand in short

लहानपणापासून प्रखर आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून स्वामीजींची ओळख होती.

स्वामीजींच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते.

शिक्षण, तर्क, संगीत अशा क्षेत्रांत पारंगत असलेला नरेंद्र हा विवेकानंद म्हणून ओळखला जाऊ लागला.

आयुष्याच्या एका टप्प्यावर परमहंस देव यांच्याशी भेट प्रसंग घडून आल्यानंतर खऱ्या आणि उदात्त जीवनाची अनुभूती स्वामीजींना आली.

स्वामी विवेकानंद हे आध्यात्मिक उन्नती साधल्यानंतर पूर्ण भारतभर आणि त्यानंतर विश्वभर धर्म आणि आध्यात्मिकतेचा प्रसार करण्यात यशस्वी ठरले.

जन्म – 12 जानेवारी 1863
समाधी – 04 जुलै 1902

स्वामी विवेकानंद यांचे अद्भुत विचार / संदेश –
Swami Vivekanand Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. प्रस्तुत ५ सर्वोत्तम स्वामी विवेकानंद यांचे संदेश (Top 5 Quotes by Swami Vivekanand) तुमच्या जीवनाची दिशा आणि गती बदलण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

१ – “उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.”

२ – “एखादा मूर्ख जगातील सर्व पुस्तके विकत घेऊ शकतो आणि ती त्याच्या लायब्ररीत देखील असतील; परंतु तो तीच पुस्तके वाचेल जी पुस्तके वाचण्यास तो सक्षम असेल.”

३ – “प्रत्येक काम या टप्प्यांमधून जावे लागते – उपहास, विरोध आणि नंतर स्वीकृती. जे लोक आपल्या वेळेच्या पुढचा विचार करतात त्यांच्याबद्दल आत्ता गैरसमज होणे नक्कीच आहे.”

४ – “आपण आत्ता जे आहोत त्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि आपण जे काही बनू इच्छितो ते बनण्याची शक्ती आपल्यात असते. जर आपण आत्ता जसे आहोत ते आपल्या स्वतःच्या भूतकाळातील क्रियांचा परिणाम झाला असेल तर भविष्यात आपल्याला जे काही हवे आहे ते आपल्या सध्याच्या कृतीतून तयार केले जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला माहीत असायला हवे की आपली कृती कशी असावी.”

५ – “एका वेळी एक गोष्ट करा आणि ते करत असताना इतर सर्व गोष्टी वगळून आपले सर्व अस्तित्व त्या गोष्टीत ओतून द्या.”

राष्ट्रीय युवक दिवस / स्वामी विवेकानंद जयंती – १२ जानेवारी | National Youth Day / Swami Vivekanand Jayanti |

भारतात १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी “राष्ट्रीय युवक दिवस” म्हणून साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.

स्वामी विवेकानंद यांचे कार्य हे सर्व युवकांना प्रेरक असल्याने भारतीय युवाशक्ती धर्म, देश, अध्यात्म, अशा उदात्त दिशांनी प्रवाहित होण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येतो.

खालील लेखामध्ये राष्ट्रीय युवक दिवस – १२ जानेवारी (National Youth Day) कसा साजरा केला जातो याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली आहे.

वाचकांसाठी थोडेसे –

तुम्हाला स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekanand Information In Marathi) कशी वाटली? त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा. या लेखाबद्दल काही सूचना असल्यास नक्की कळवा… धन्यवाद!

स्वामी विवेकानंद हे थोर पुरुष होते. त्यांनी मानवी गुण जपत जी अध्यात्मिक प्रगती साधली त्यामुळे आपण सर्वजण त्यांना पुजतो. समाजातील सर्व घटकांना त्यांच्याबद्दल आदर आहे. स्वामी विवेकानंद माहिती हा लेख संदर्भ लेखन आहे आणि ते प्रकाशित (publish) करताना आम्हाला आनंद आहेच परंतु ही माहिती चुकीची आढळल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

The post स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekananda Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/swami-vivekanand-information-in-marathi/feed/ 1 1922
शिवजयंती माहिती मराठी | Shivjayanti Information In Marathi https://dailymarathinews.com/shivjayanti-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/shivjayanti-information-in-marathi/#comments Sat, 02 Jan 2021 00:18:23 +0000 https://dailymarathinews.com/?p=1891 महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा सणच आहे.

The post शिवजयंती माहिती मराठी | Shivjayanti Information In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
अशा सणाबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किशोर पिढी, तरुण पिढी आणि इतर सर्व घटकांना माहिती होणे अत्यावश्यक आहे. त्याचाच विचार करून आम्ही या लेखामध्ये शिवजयंती माहिती (Shivjayanti Information in Marathi) दिलेली आहे.

महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा सणच आहे.

शिवजयंती उत्सव | शिवजन्मोत्सव | Shivjayanti Utsav Mahiti Marathi |

शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. सर्व स्तरांतून शिवजयंती साजरी होताना प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो. काहीजण त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. कलापथके त्यांच्या कलेमार्फत शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगतात. त्यासाठी नृत्य, संगीत, वादन, अभिनय अशा विविध कलांचा उपयोग केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण असतो. छ. शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाला शिवजयंती (Shivjayanti), शिवजन्मोत्सव (Shiv Janmotsav) असेही म्हणतात.

शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराज्य स्थापना तसेच राज्य कारभार असे सर्व बोध समाज मनाला होण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जात असते.

शिवजयंती तारीख ( Shivjayanti Date )

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. त्यांच्या जन्म तारखेबद्दल पूर्वी खूप वाद होते. आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीया (६ एप्रिल १६२७) आणि मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया (१९ फेब्रुवारी १६३०) हे दोन दिवस शिवरायांचे जन्मदिवस म्हणून मानले जातात.

महाराष्ट्र सरकारने २००१ मध्ये या वादावर निर्णय घेत फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख स्वीकारली. सर्व सरकारी – खाजगी शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि उद्योगांना या दिवशी सुट्टी असते. सर्व लोक मोठ्या प्रेरणेने आणि उत्साहात शिवजयंती साजरी करतात.

शिवजयंतीची सुरुवात –

शिवजयंती प्रथम कोणी साजरी केली? किंवा शिवजयंतीची सुरुवात कशी झाली? असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्यांची आपल्याला माहिती असणे अत्यावश्यक आहे. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर एक एक पोवाडा लिहिला.

शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि नेतृत्व कसे होते हे लोकांपर्यंत पोहचवण्याचे सर्वप्रथम काम महात्मा जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती साजरी करून केले. तीच महाराजांची पहिली शिवजयंती होती आणि तो सर्व कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यांच्या व्यतिरिक्त लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

वाचकांसाठी थोडेसे –

तुम्हाला शिवजयंती माहिती (Shivjayanti Information In Marathi) कशी वाटली? याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा. शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आणि कर्तृत्व रुजवण्याचा प्रयत्न असू द्या… धन्यवाद!

The post शिवजयंती माहिती मराठी | Shivjayanti Information In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shivjayanti-information-in-marathi/feed/ 1 1891
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक | Chhatrapati Sambhaji Rajyabhishek | https://dailymarathinews.com/chhatrapati-sambhaji-rajyabhishek/ https://dailymarathinews.com/chhatrapati-sambhaji-rajyabhishek/#respond Sun, 27 Dec 2020 23:51:28 +0000 https://dailymarathinews.com/?p=1881 छ्त्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji Maharaj) हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य आहेत. त्यांच्या निमित्ताने स्वराज्य निर्मिती झाली, पण तिचा कार्यभार जबाबदारीने सांभाळणे आणि मराठा साम्राज्य वाढवण्याचे ...

Read moreछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक | Chhatrapati Sambhaji Rajyabhishek |

The post छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक | Chhatrapati Sambhaji Rajyabhishek | appeared first on Daily Marathi News.

]]>
छ्त्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji Maharaj) हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य आहेत. त्यांच्या निमित्ताने स्वराज्य निर्मिती झाली, पण तिचा कार्यभार जबाबदारीने सांभाळणे आणि मराठा साम्राज्य वाढवण्याचे खरे काम स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapti SambhajI Maharaj) यांनी केले. त्यांना छत्रपती म्हणून मिळालेली पदवी त्यांचे माहात्म्य सिद्ध करते. या लेखात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक (Chhatrapati Sambhaji Rajyabhishek) कसा झाला याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक पूर्वकाळ | श्रीशंभुराज्याभिषेक|Chhatrapti Sambhaji Maharaj Rajyabhishek |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचानक झालेल्या निधनानंतर रयत पुन्हा एकदा बिथरली जाऊ शकत होती. स्वराज्याचे धाकले मालक संभाजी महाराज हे राज्यकारभार पाहतच होते परंतु आता राज्याला छत्रपतींची गरज होती. त्या गरजेला ओळखून शंभूराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन घेतला. स्वराज्य व्यवस्थित आणि नेटाने चालवण्याचे आव्हान त्यांनी या दिवसानंतर पेलले.

राज्याभिषेक सहज व्हावा आणि तो सर्वमान्य असावा अशी परिस्थिती असताना देखील जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या गेल्या. छ्त्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा त्यांच्या राज्याभिषेकावेळी शंभू महाराज युवराज होते तेव्हाच स्पष्ट झाले होते की संभाजी महाराजच भावी छत्रपती असतील.

राजा शंभू हे शिवाजी महाराजांबरोबर लहानपणापासून दौडत होते. त्यांच्या सोबत राहिले होते. सर्व युद्धकला, शास्त्र, आणि राजकारण यामध्ये तरबेज झाले. त्यामुळेच शिवछत्रपतींचाच्या आदेशावरून पन्हाळा गडावरून त्यांनी स्वतःची
कारकीर्ददेखील सुरू केली. तेथील परिसराचा राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.

छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यानंतर आणि शंभूराजांच्या गैरहजेरीत वयाने खूपच लहान असलेले राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला पण शंभूराजांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली. गादीसाठी फुटीर राजकारण स्वराज्यात होऊ शकते याचे भान राखून शंभूराजांनी राज्याभिषेक करवून घेण्याचा निर्णय घेतला.

शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच २० जुलै १६८० रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि स्वतः स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाल्याचे घोषित केले.

(तारखे संदर्भात विविध मतभेद आढळतात याची नोंद घ्यावी)

श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा | chhatrapati sambhaji maharaj Rajyabhishek |

बिकट काळात आणि वातावरणात मंचकरोहणात राज्याभिषेक झाला होता पण शास्त्रार्थ दृष्टीने त्यामध्ये दोष असल्याचे सर्वांना आढळले. विधियुक्त राज्याभिषेक झाला पाहिजे असे शंभूराजांना पण वाटू लागले त्यानुसार मग रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२ म्हणजेच १४, १५ व १६ जानेवारी १६८१ यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.

राज्याभिषेकावेळी पूर्व कैद्यांना मुक्त करणे अशी परंपरा असल्याने शंभू राजांनी त्यांना मुक्त केले. राज्याभिषेक प्रसंगी छत्रपती संभाजी राजांनी स्वतःच्या नावे नवीन नाणी (चलन) बनवून घेतली. पुढील बाजूस “श्री राजा शंभूछत्रपती” अशी अक्षरे कोरली तर मागील बाजूस “छत्रपती” हे अक्षर कोरले.

छत्रपती संभाजीराजे यांचे प्रधान मंडळ | Chhatrapati Sambhaji Maharaj Pradhan Mandal |

संभाजी राजे छत्रपती झाल्यानंतर लगेच त्यांनी प्रधान मंडळाची स्थापना केली. ते प्रधान मंडळ पुढीलप्रमाणे –

छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.

श्री सखी राज्ञी जयति (राजाच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी) – येसुबाई संभाजीराजे भोसले.

सरसेनापती – हंबीरराव मोहिते.

कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश.

पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे.

मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी.

चिटणीस – बाळाजी आवजी.

दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव.

सुरनीस – आबाजी सोनदेव.

मुजुमदार – अण्णाजी दत्तो.

डबीर – जनार्दनपंत.

वाकेनवीस – दत्ताजीपंत.

तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक (Chhatrapati Sambhaji Rajyabhishek) हा लेख कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा…धन्यवाद!

वाचकांसाठी आवाहन –

ऐतिहासिक घटना या काळाप्रमाणे वाढवून आणि बदलून सांगितल्या जातात. त्यामध्ये अधिक रस येण्यासाठी कधीकधी अतिशयोक्ती देखील केलेली असते. आत्ताच्या पिढीत झालेले लिखाण हे मागील पिढीतील केलेल्या लिखाणावर आधारित असते म्हणून खरा इतिहास आपल्याला कळण्याचे मार्ग तसे खूप कमी आहेत. अशा संदर्भाने आम्ही प्रसिद्ध केलेले लेख हे एक प्रकारे माहितीचा आधार घेऊन केलेले ऐतिहासिक वर्णन आहे. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही. माहिती चुकीची आढळल्यास त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.

The post छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक | Chhatrapati Sambhaji Rajyabhishek | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/chhatrapati-sambhaji-rajyabhishek/feed/ 0 1881
छत्रपती शिवाजी महाराज माहिती । Shivaji Maharaj Information in Marathi https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-information-in-marathi/#comments Fri, 12 Jun 2020 10:45:32 +0000 https://dailymarathinews.com/?p=1698 श्री. छत्रपती शिवाजी महाराज ( chhatrapati Shivaji Maharaj ) हे युगपुरूष होते. त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन हे स्वराज्य निर्मितीसाठी वाहून घेतले. त्यांचा आणि महाराष्ट्राचा संपूर्ण ...

Read moreछत्रपती शिवाजी महाराज माहिती । Shivaji Maharaj Information in Marathi

The post छत्रपती शिवाजी महाराज माहिती । Shivaji Maharaj Information in Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
श्री. छत्रपती शिवाजी महाराज ( chhatrapati Shivaji Maharaj ) हे युगपुरूष होते. त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन हे स्वराज्य निर्मितीसाठी वाहून घेतले. त्यांचा आणि महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास पाहता आपल्याला कळून येते की स्वराज्य हे शून्यातून निर्माण केलेले राज्य होते. या संपूर्ण लेखात छ. शिवाजी महाराज कसे घडले, त्यांचे पराक्रम आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग वर्णिलेले आहेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण इतिहास आणि माहिती (Shivaji Maharaj Information In Marathi) देण्यात आलेली आहे.

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ( History Of Maharashtra Before King Shivaji )

पूर्वी भारतातील संस्कृती ही विविधतेने सजलेली होती. प्रत्येक समाजात आणि प्रदेशात थोड्या फार फरकाने सांस्कृतिक आणि पारंपारिक फरक होता. त्यातील मुख्य फरक म्हणजे बोलीभाषेचा फरक! महाराष्ट्र हे राज्य नावारूपाला आलेले नसताना मराठी भाषिक ज्या प्रदेशात होते तेथे विविध कलाप्रकार आणि अध्यात्मिक बांधिलकी मात्र होती. त्यावरून हिंसाचार हा कधीच महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती राहिलेली नाही. 

आध्यात्माचे एक पौराणिक अधिष्ठान महाराष्ट्रात स्थित होते. त्यावरून कळून येते की चार वर्णव्यवस्था ज्या संपूर्ण भारतात लागू होत्या त्या मराठी प्रदेशातही लागू झाल्या होत्या. या सर्व पारंपारिक प्रथा आणि विभागलेला समाजच परकीय आक्रमणाला कारणीभूत होता. अफगाणी सुलतान, बादशाह, पोर्तुगिज आणि इंग्रज हे या भूभागावर आक्रमण करतच आले होते. त्यांची पाळेमुळे वाढत जाण्याचे कारण म्हणजे त्यांनी भारतीयांना दाखवलेली महत्वाकांक्षेची स्वप्ने होती.

वेगवेगळ्या भागांत सांस्कृतिक आणि पारिभाषिक फरक असल्यामुळे हे सर्व परकीय पूर्ण देशावरच सत्ता स्थापन करू शकले. महाराष्ट्रात किंवा पर्यायाने भारतात अगोदर राजे असायचे. त्यांचे हुकुमी नियम आणि प्रजादक्ष कारभार हा कुठल्याही राज्यासाठी हितावह होताच परंतु परकीय आक्रमणाची खबरदारी न घेतल्याने सर्व राज्ये मुघल आक्रमणाने ग्रसित होत गेली. उत्तरेत मुघल राज्य करीत होते तर फक्त महाराष्ट्राचा इतिहास लक्षात घेता अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांच्या अधिपत्याखाली पूर्ण महाराष्ट्र विभागलेला दिसून येत होता.

दोन्ही सुलतान एकमेकांविरुद्ध लढत होते. त्यांना या मराठी प्रदेशात कुठलाच तिसऱ्या सत्तेचा विरोध नव्हता. याउलट सर्व मराठी सरदार मात्र तुटपुंज्या वेतनात वतनदारी मिळवायचे आणि गडकिल्ल्यांचे संरक्षण करायचे. स्वराज्य असा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे सामान्य रयतेवर झालेले अन्याय हे आपल्याच लोकांकडून करवून घेतले जायचे आणि हे सम्राट मात्र खुशाल राज्य करायचे. 

उत्सव साजरे करणे, पूजा करणे यांना बंदी येत होती. मंदिरे लुटली जात होती. वतनदारी आणि जहागिरी मिळवण्यातच मराठी घराणी व्यस्त होती. पूर्वीपासूनच राजेशाही ही पाहिली नसल्याने आणि एकजुटता नसल्याने प्रत्येक विभागात एक वेगळाच सरदार असायचा तो देखील कधी निजामशाहकडे तर कधी आदिलशाहकडे कार्यरत असायचा. त्यामुळे आक्रमण आणि प्रतिक्रमण होतच असायचे. सामान्य जनता एकदम त्रासून गेली होती. 

शेतकी आधार असल्याने उदरनिर्वाह तर व्हायचा परंतु त्यातदेखील कर आणि पिकवणीवर हे वतनदार हक्क दाखवायचे. अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असल्याने रयत त्यामध्ये गुंग होऊन जायची परंतु अन्याय वाढत होता तेव्हा अन्यायाला लगेच प्रतिकार होत नव्हता आणि तेवढी वेळ मारून नेली जात होती. त्यापूर्वी आणि त्याकाळात देखील संतांची आणि साधूंची परंपरा महाराष्ट्रात होती त्यामुळे जगण्याचा एक उदात्त आधार ही संतमंडळी होती. 

• मराठा सरदार शहाजीराजे भोसले! ( Sardar Shahaji Raje Bhosale )

शहाजी राजे भोसले

आदिलशाह आणि निजामशाह अशा दोन सत्ता महाराष्ट्रात केंद्रित असल्या तरी काही मराठे सरदार रयतेची काळजी करत असत. त्यापैकीच एक शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे होते.

• छ. शिवाजी महाराजांचा पूर्वपिढी इतिहास ( History of Bhosale Gharana )

वेरूळच्या भोसले घराण्याचे बाबाजीराव हे गावचे पाटील होते. त्यांना विठोजीराजे आणि मालोजीराजे अशी दोन मुले होती. दोन्ही मुले शुर होती. त्यांच्याकडे मोठी मराठ्यांची फौज होती. हत्यार बळ देखील होते. हे दोन्ही बंधू पराक्रमी असल्याने त्यांची प्रसिद्धी चारी दिशेला पसरली होती. 

त्याकाळी दौलताबाद ही निजामशाहची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा एक वजीर होता. तो देखील शुर आणि कर्तबगार होता. वेरूळ हे ठिकाण दौलताबादपासून जवळच होते. भोसले बंधूंचे पराक्रम मलिक अंबर जाणून होता.

वारंवार निजामशाहीवर होणारे उत्तरेकडील मुघल आक्रमण थोपवण्यासाठी या दोघांची मदत होऊ शकते हे मलिक अंबर जाणून होता. त्याने निजामशाहला याबद्दल माहिती दिली आणि त्या दोघांबद्दल शिफारसही केली. निजामशाहने मग या भोसले सरदारांना पुणे आणि सुपे परगण्यांच्या जहागिरी दिल्या. 

फलटणच्या निंबाळकर घराण्यातील उमाबाई या मालोजीराजे यांच्या पत्नी होत. या दाम्पत्याला शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुले होती. ज्यावेळी इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले त्यावेळी शहाजीराजे पाच वर्षाचे होते. त्यानंतर त्यांचे बंधू विठोजी राजे यांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. 

दिवस छान चालले होते. शहाजी आणि शरीफजी दोघे पराक्रमी बनत चालले होते. शस्त्र चालवण्यात तरबेज झाले होते. विठोजी राजे यांनी निजामशाहीतील आणखी एक शूर मराठा सरदार लखुजीराव जाधव यांच्या मुलीसाठी शहाजीराजे यांचे स्थळ सांगितले. लखुजीराव हे खूप मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशाहच्या दरबारी त्यांचा खूप मोठा मान होता. 

लखुजीराव जाधव यांची मुलगी म्हणजे जिजाबाई. जिजाबाई या हुशार आणि सुलक्षणी होत्या. विठोजी राजे आणि लखुजीराव हे दोघे शूरवीर होतेच शिवाय मराठा सरदार एकवटले जावेत या उद्देशाने शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह करवून देण्यात आला. हा विवाह खूप उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. जिजाबाई आता भोसले घराण्याची सून झाली होती. 

शहाजीराजे पराक्रमी होतेच. त्याची ख्याती निजामशाह ओळखून होता. मालोजीराजे यांची जहागिरी काही काळानंतर शहाजीराजे यांच्यावर सोपवण्यात आली. मुघल सम्राट निजामशाही जिंकण्याच्या बेतात होता. त्याने विजापूरचा आदिलशाह याला मदतीचा हात मागितला. मग दोघांच्या करारावरून त्यांनी निजामशाहीवर आक्रमण केले. शहाजीराजे, शरीफजी आणि वजीर मलिक अंबर हे निकराने लढले. त्यांनी या दोन्ही फौजांचा पराभव केला. ही लढाई अहमदनगरजवळ भातवडी येथे झाली. या लढाईत शरीफजी ठार मारले गेले.

या लढाईनंतर शहाजीराजे यांचा मान आणि प्रतिष्ठा वाढली. खुद्द निजामशाह त्यांच्यावर खूप खुश होता. आता मलिक अंबर मात्र त्यांच्यावर जळू लागला होता. त्या दोघात वितुष्ट निर्माण झाले. पुढे निजामशाहीत पुन्हा वाद नको म्हणून शहाजीराजे निजामशाहीतून बाहेर पडले. त्यांची पुढे खरी पदोन्नती आदिलशाहीत झाली. आदिलशाहने त्यांना सरलष्कर ही पदवी बहाल केली. 

आता इकडे निजामशाहीचा उतरता काळ सर्वजण पाहत होते. वजीर अंबर मलिक मृत्यू पावला होता. त्याचा मुलगा फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. अंबर मलिक नंतर तो निजामशाहीत वजीर बनला. त्याचा कारभार पाहता मुघलांचे पुन्हा एकदा आक्रमण होईल अशी भीती निर्माण झाली. खुद्द निजामशाहच्या आईने शहाजीराजांना पुन्हा निजामशाहीत कार्यरत होण्यासाठी सांगितले. वजीर अंबर मलिकचा मृत्यू झाला असल्याने शहाजीराजांच्या नकाराचे काही कारण नव्हते. आता शहाजीराजे पुन्हा निजामशाहीत सेवेसाठी रुजू झाले. 

छ. शिवाजी महाराज जन्म आणि बालपण | Shivaji Maharaj Birth and Childhood | 

शिवरायांचा जन्म

आदिलशाही सोडल्यामुळे शहाजीराजांवर संकट ओढवले होते. आदिलशाहने पुणे या त्यांच्या जहागिरीच्या गावी आक्रमण केले होते. अशातच मुघल बादशाह शाहजहान याने भले मोठे सैन्य दक्षिण भाग जिंकण्यासाठी पाठवले होते. शहाजीराजांची धावपळ वाढली होती. त्यांच्या पत्नी जिजाबाई या काळात गरोदर होत्या. जिजाऊंचे हाल करून चालणार नव्हते. त्यांना कुठे तरी सुरक्षित ठेवणे अपेक्षित होते. 

भक्कम उंच कडे आणि तटबंदी असलेला जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला शहाजीराजांना सर्वात सुरक्षित वाटला. त्यांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले आणि त्यांनी मुघल सत्तेविरुद्ध लढाईस निघून गेले. विजयराज हा त्यावेळी किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने जिजाबाईंच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली.

दिवसामागून दिवस सरत होते. अखेर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी शिवनेरीवर तेजाचा कुंभ जन्मला. ती तारीख होती १९ फेब्रुवारी १६३०. सर्व किल्ल्यावर आणि परिसरात आनंदाची रेलचेल सुरू झाली. सनई चौघडे वाजू लागले. जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला होता. शिवनेरी किल्ल्यावर झालेला जन्म आणि शिवाई देवीच्या नावावरून या पुत्राचे नाव “शिवाजी” असे ठेवण्यात आले. 

शिवरायांच्या बालपणाची सर्व वर्षे संस्कारीत झालेली होती. माता जिजाऊंचा सहवास कधी सुटला नाही. रामायण, महाभारत तसेच भारतीय इतिहास जिजाऊ शिवाजींना सांगत असत. त्या मोकळ्या वेळेत अर्जुन, भीम, अभिमन्यू, राम, लक्ष्मण या शूरवीरांच्या कथा शिवाजींना सांगत असत. काहीतरी पराक्रम करून दाखवण्याची ऊर्मी आणि तडप बाळ शिवाजींना वाटू लागली होती. याबरोबरच जिजाऊ त्यांना साधूसंतांच्या गोष्टीदेखील सांगत असत. त्यामुळे पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. 

मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. रानात फिरणे, लपंडाव, पक्ष्यांचे आवाज काढणे, मातीचे प्राणी आणि किल्ले बनवणे अशा प्रकारचे खेळ सर्वजण मिळून खेळत असत. 

शहाजीराजे आणि नवीन निजामशाही | Shahaji Raje and New Nijam Empire |

शहाजीराजे निजामशाहीत परतले होते. त्यांची सेवा आणि जबाबदारी वाढली होती. परंतु निजामशाहीचा दरबार म्हणजे कुरघोडी करण्यात तरबेज होता. हेवेदावे आणि कटकारस्थाने करण्यात सर्वजण पटाईत होते. याच काळात मराठी सरदारांची आपापसात लढाई होत होती. शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव यांचा मृत्यू याच काळात झाला. त्यांच्या मृत्यूची कारणे आणि आपसातील वैर शहाजीराजांना स्वस्थ बसून देत नव्हते. 

शहाजीराजे आता मुघल सत्तेत रुजू झाले. सरदारकी आणि जहागिरी आता सुरक्षित असणार होती. याचदरम्यान निजामशाहीत वजीर असणारा फत्तेखान हा भलताच दगाबाज निघाला. त्याने मुघलांची सहाय्यता घेऊन निजामशाहचा अंत केला. आता सर्व निजामशाही मुघलांच्या सत्तेत जाणार हे स्पष्ट होते. शहाजीराजांच्या जहागिरीत असणारा आणि मुघलांच्या सत्तेत नसणारा असा काही प्रदेश परस्पर फत्ते खानने मुघलांना देऊ केला. 

शहाजीराजे मुघल, निजामशाही आणि आदिलशाही या तिन्ही सत्तांना कंटाळले होते. स्वतःचे सामर्थ्य पूर्ण पणाला लावत त्यांनी पुन्हा एक नवीन निजामशाही स्थापण्याचा निर्णय घेतला. निजामाच्या वंशातील एका मुलाचा नवीन निजामशाह म्हणून जयघोष केला. जुन्नरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला नवीन निजामशाह बनवले.

एक नवे राज्य शहाजीराजांनी उदयास आणले होते. नीरा आणि गोदावरी नदी यामधील सर्व प्रदेश या नवीन निजामशाहीत येत होता. आदिलशाहने प्रथम त्यांना या कामात साथ दिली परंतु खुद्द मुघल सम्राट शहाजहान दक्षिणेत चालून आला आणि त्याने आदिलशाहला दम दिला. या आक्रमणाला विरोध करून चालणार नव्हते. आदिलशहाने शहाजीराजांविरोधात मुघलसत्तेशी मैत्रीपूर्ण तह केला.

शहाजीराजे आता या दोन्ही सत्तांशी गनिमीकाव्याने लढू लागले. मुघल आणि आदिलशाही सत्ता खूप विस्तारलेली होती. शहाजीराजांचा प्रतिकार अपुरा पडत होता. शेवटी त्यांना मुघलांशी तह करावा लागला. नवीन राज्य उदयास आणण्याचे त्यांचे स्वप्न काही साकार झाले नाही. परंतु मराठी सरदार आणि रयतेस मात्र एक नवीन आत्मविश्वास मिळाला होता की आपणही राज्य निर्माण करू शकतो. 

आदिलशाह आणि मुघल यांनी मिळून नवीन निजामशाहीचा भाग वाटून घेतला. शहाजी राजांची पूर्वीची जहागिरी पुणे-सुपे आदिलशाहने परस्पर शहाजीराजांना देऊ केली. आता त्यांना विविध मोहिमांवर जावे लागे. पुणे ते दूर कर्नाटकपर्यंतचा भूभाग जिंकण्याचा आदिलशाहीचा मनसुबा होता. या  कामी त्यांनी शहाजीराजांची निवड केली. शहाजीराजे या मोहिमेत फत्ते प्राप्त करत गेले. बाळ शिवाजी आणि जिजाऊ त्यांच्यासोबतच असत. आपल्या वडिलांचे पराक्रम बाल शिवाजीच्या कानी पडत होते. आदिलशाहने खुश होऊन शहाजीराजांना बंगळूरची जहागीरी बहाल केली. बंगळूरमध्ये बाळ शिवाजी आणि जिजाऊ आनंदाने राहू लागले होते. 

आत्तापर्यंत शहाजीराजांबरोबर जिजाऊ आणि शिवाजी राजे होते. परंतु आता कर्नाटकातील पुढची राज्ये जिंकण्यासाठी त्यांना सोबत नेता येणार नव्हते. स्वतःची जहागीर पुणे-सुपे सांभाळण्यासाठी त्यांनी जिजाऊंची आणि बाळ शिवाजीची मोठे सैन्यबळ, हत्ती, घोडे, खजिना आणि ध्वज देऊन रवानगी केली.

. शिवरायांचे शिक्षण | Shivaji Maharaj Education 

शिवराय जेव्हा जेव्हा शहाजीराजांच्या सोबत होते. शहाजीराजे त्यांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत. ते स्वतः मोहीमांवर असताना त्यांनी शिक्षकांची नेमणूक केली होती. एकदम अल्पकाळात शिवराय लिहायला आणि वाचायला शिकले.

काही जवळचे सरदार आणि शिक्षक त्यांना घोड्यावर बसणे, दांडपट्टा आणि तलवार चालवणे, अशा कला शिकवत असत. शहाजीराजांचे पराक्रम नेहमी शिवरायांना ऐकायला मिळत. रामायण, महाभारतातील साहसी कथांबरोबर वडिलांचे पराक्रम ऐकताना देखील त्यांना स्फुरण चढत असे. 

शहाजीराजांनी पुण्याला पाठवणी केल्यानंतर जिजाबाईंनी शिवरायांचा सांभाळ केला. मुघल सत्ता आणि काही छुप्या शत्रूंच्या आक्रमणाने पुणे बेजार झाले होते. पुणे-सुपे ही शहाजीराजांची जहागिरी होती आणि त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे हे जिजाऊंनी ओळखले होते. 

जिजाबाई, शिवराय आणि सोबतीचे काही विश्वासू सरदार असे सर्वजण पुण्यात राहू लागले. पुण्यात लोकांना खूप मोठा आधार मिळाला होता. लोक आता तिथे शेती करू लागले होते. मंदिरे पुनर्स्थापित केली जाऊ लागली होती. पडकी घरे पुन्हा उभारली गेली होती. हे सर्व शिवराय जवळून पाहत होते. 

जिजाऊंचा कणखर बाणा शिवराय अंगिकारत होते. युद्धकलेचा सराव एका बाजूने चालूच होता. तसेच प्रजाहित आणि राज्यकारभारही शिकत होते. शत्रूशी करावे लागणारे युद्ध आणि त्याची नीती यामध्ये शिवराय पारंगत होत होते. गनिमी कावा कसा करायचा, घोडे व हत्ती यांची पारख कशी करायची असे काही गुणदेखील शिवरायांनी हेरले होते. 

• दादोजी कोंडदेव आणि इतर कार्यकारी मंडळी | Dadoji Kond Dev Information |

दादोजी कोंडदेव शहाजीराजे नसताना पुण्याची जहागिरी संभाळण्यामध्ये महत्वाची कामगिरी बजावत होते. त्यांचा जिजाऊंना अनेक राजकीय आणि सामाजिक निर्णय घेण्यात मोलाचा हातभार लागला. राजकीय समीकरण, राजकारण आणि प्रजाहित कारभार कसा करायचा याचे उत्तम मार्गदर्शन दादोजी कोंडदेव शिवरायांना करत असत.

पुणे जहागिरीत आता शिवराय हळूहळू कारभार पाहू लागले होते. शहाजीराजांनी अनेक मातब्बर मंडळी या जहागिरीत रुजू केली होती. बंगळूरहून पाठवताना सरनौबत माणकोजी, रघुनाथ बल्लाळ सबनीस, बाळकृष्ण हणमंते, सामराज नीलकंठ पेशवे या अधिकाऱ्यांना शहाजीराजांनी पुण्याच्या कारभारात सहाय्य करण्यासाठी सांगितले होते. 

या सर्व अधिकाऱ्यांचा पुण्याच्या विकासात खूप मोलाचा वाटा आहे. शिवराय लहानपणीच न्यायनिवाडा करू लागले होते. शहाजीराजांना आता खरा वारसदार लाभला होता. स्वराज्याचे स्वप्न रुजू लागले होते. एक प्रकारे मराठी साम्राज्याचा सूर्योदय होत होता. संकटसमयी कोण कसा वागतो त्यावर त्याचे चरित्र घडत असते अशी मूलभूत शिकवण जिजाऊंची होती. राज्याचे आणि रयतेचे हित यातच राजाचे हित असते यावर जिजाऊंचा विशेष जोर होता, त्यानुसार शिवराय घडत होते. 

छ. शिवरायांचे लग्न | Shivaji Maharaj Marriage | Shivaji Raje’s Wife Saibai |

त्या काळी लहानपणी लग्न करण्याची प्रथा होती. अशातच शिवरायांना वधु शोधण्यास प्रारंभ करण्यात आला. भोसले घराण्याची शालीनता आणि कुळ सांभाळणारी मुलगी हवी असा माता जिजाऊंचा आग्रह होता. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई ही जिजाऊंच्या पसंतीस उतरली. हा विवाह मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. 

छ. शिवाजी महाराजांची स्वराज्य प्रतिज्ञा । Swarajya Pratidya |

शिवराय आणि काही मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले होते. शिवराय तेव्हा १५ वर्षांचे कुमार होते. १६४५ चे ते वर्ष होते. त्या दिवशी काय घडणार होते? याची मागमूस मावळ्यांना नव्हती. भगवान शंकराला कोणते मागणे मागणार होते? 
शिवराय त्यांचे बोलणे स्पष्ट करतात,”वडील शहाजीराजे हे विजापूरचे सरदार आहेत. इथली जहागिरी आणि सरदारकी भविष्यात आमच्या हाती असणार आहे. परंतु मला काही यात स्वारस्य नाही. मी जे स्वप्न पाहतो आहे ते कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल परंतु आपल्या लोकांसाठी आणि आपल्या राज्यासाठी ते हितकर असेच आहे.”

शिवराय पुढे बोलणे चालू ठेवतात, “सुलतान आणि परकीय सत्ता आपल्यावर राज्य करीत आहे याची जाणीव आम्हाला आहे. जहागिरी जरी असली तरी पूर्ण राज्य हे स्वराज्य असले पाहिजे. एकच राजा, एकच न्याय असला पाहिजे. परकियांच्या सत्तेत अनेक जुलूम होत राहतात. त्यांना इथल्या संस्कृतीची जाणीव नाही. कुटुंब आणि गाव यांचा नायनाट करत या सत्ता आपल्यावर राज्य करीत असतात.”

एवढे बोलून ते थांबत नाहीत. पुढे शिवराय म्हणतात, “आदिलशाह आणि निजामशाह यांनी आपले राज्य वाटून घेतले आहे. त्यावर जोर म्हणून मुघल आक्रमण देखील होत असते. आता ही गुलामगिरी शक्य नाही. वतनदार, सरदार यांनी एकत्र आले पाहिजे. दिलेल्या तुकड्यांवर किती दिवस जगायचे?”

असे शिवराय बोलत असताना सर्व मावळे त्यांच्याकडे उमेदीच्या नजरेने पाहू लागले होते. मावळे नव्हते ते, जणू राजदरबारात एखादा राजा आज्ञा करत आहे असेच सर्वांना वाटू लागले होते. “बोला राजे, काय करायचं?” असं म्हणत मावळे शिवरायांकडे पाहू लागले.

राजे हा शब्द प्रथमच शिवरायांना एक ऊर्जा देऊन गेला, स्फुरण देऊन गेला. मावळ्यांनो, या रायरेश्वराच्या मंदिरात या शंकराला साक्षी ठेऊन शपथ घेऊया. एक दिवस स्वराज्य स्थापन होईल, आपण सर्वजण मिळून ते करू! “हे हिंदवी राज्य स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!” असा ललकार करीत हर हर महादेवचा जयघोष मंदिरात घुमला.

लाल महालात परत येताच घडलेला प्रसंग शिवरायांनी जिजाऊंना बोलून दाखवला. सुवर्ण काळाची प्रतिक्षा आता संपणार, असा विश्वास जिजाऊंना वाटला. जिजाऊ आज धन्य झाली होती. स्वराज्य स्थापनेचा विडा माझ्या शिवबाने उचलला. हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असे मनोमन म्हणत जिजाऊंनी शिवरायांना आशिर्वाद दिला.

• मावळे हेच स्वराज्याचे सैनिक :-

प्रथमतः सुरुवात म्हणून त्यांनी सर्व मावळ्यांना जमवायला सुरुवात केली. होतकरू तरुण शस्त्रविद्या घेऊ लागले. तलवार, दांडपट्टा चालवणे, घोडे फिरवणे असे चक्र सुरू झाले. आसपासचा सर्व परिसर पिंजून काढला. दरीखोरी, आडमार्ग, चोरवाटा शोधून काढल्या. आसपासचे किल्ले तसेच शत्रुची सत्ता, हत्यारे दारूगोळा यांवर त्यांची करडी नजर होती. 
मावळ प्रदेशात असणारे सर्व वतनदार शिवरायांनी एकत्र आणले. आपापसातील भांडणे मिटवली. स्वराज्याचे स्वप्न सर्व जनतेत जागृत केले. मावळ प्रदेशातील बाजी पासलकर, झुंजारराव मरळ, हैबतराव, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल इत्यादी देशमुख वतनदार मंडळी एकवटली. 

तोरणा गड आक्रमण – स्वराज्याचे तोरण ! Shivaji Maharaj won Torana fort | 

महाराष्ट्रात मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि सिद्दी अशा चार सत्ता केंद्रित होत्या. चार सत्तांना तोंड देणे अवघड होते. शिवराय स्वराज्याची शपथ घेतात खरी पण ती निभावणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम होते. थोडेसे मावळे आणि काही विश्वासू जवळचे लोक यांसोबत शिवराय स्वराज्य बांधणीची सुरुवात कशी काय करणार होते?

 शिवरायांकडे असलेल्या जहागिरीत पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर येत असे. या जहागिरीत असलेले किल्ले आपल्या सत्तेत असले पाहिजेत त्याशिवाय स्वराज्य शक्य नाही, असे शिवरायांना मनोमन वाटत होते. ज्याच्या ताब्यात किल्ला तोच आसपासच्या प्रदेशावर राज्य करीत असे. 

एखादा भक्कम किल्ला ताब्यात घेतला पाहिजे अशी गरज शिवरायांना वाटू लागली. एखादा डोंगरी किल्ला घेतला की त्यावरून सुरुवातीला तरी राज्य करता येईल असा निश्चय करत पुण्याच्या नैऋत्येस कानद खोऱ्यात असलेला तोरणा हा किल्ला काबीज करण्याचे शिवराय ठरवतात. 

माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर सपाट झालेल्या भूभागाची तटबंदी. या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी झुंजार माचीवरून एकच वाट आहे. ती वाट खूपच अवघड आहे. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे. म्हणून या किल्ल्याला तोरणा असे नाव पडले. 

असा हा भक्कम किल्ला आदिलशाहच्या ताब्यात होता. पूर्णपणे दुर्गम किल्ला असल्याने पुरेसे पहारेकरी या किल्ल्यावर नव्हते तसेच पुरेसा दारुगोळा देखील नव्हता. याची संपूर्ण माहिती शिवरायांना मिळालेली होती. त्यांनी तोरणा जिंकून घेण्याचा निर्धार करीत स्वराज्याचे तोरण बांधण्याचा निर्णय घेतला. 

निवडक मावळ्यांना सोबत घेऊन शिवराय तोरणगडाकडे वाटचाल सुरू करतात. कानद खोऱ्यातून आक्रमणाची योजना बनवून किल्ल्यावर चढून जातात. मावळ्यांनी किल्ल्यावर वेगवेगळे टप्पे काबीज करीत घोडदौड चालू ठेवली. यावेळी येसाजी कंक, तानाजी मालुसरे असे वीर मावळे शिवरायांना साथ देत होते. तोरणागड जास्त परिश्रम न करता शिवराय स्वराज्यात जोडतात. त्याला नंतर प्रचंडगड असे नाव दिले जाते. 

किल्ला मोडक्या तोडक्या अवस्थेत होता. परंतु यावरूनच पुढचा कारभार करणे शक्य होणार होते. शिवरायांनी आपल्या विश्वासातील ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस या अधिकाऱ्यांच्या नेमणुका किल्ल्यावर केल्या. शिबंदीत मावळे, कोळी, महार, रामोशी अशा अनेक जातीतील शूर माणसे नेमली. 

किल्ल्याची डागडुजी सुरू झाली. काम सुरू असतानाच चार घागरी मोहरांनी गच्च भरलेल्या सापडल्या. स्वराज्याचे धन समजून त्या धनाने हत्यारे, दारूगोळा जमा केला. तोरणा गडापासून जवळच पंधरा किलोमीटर लांब मुरुंबदेवाचा डोंगर होता. तेथे एक किल्ला आदिलशाहने अर्धवट बांधून सोडला होता. त्या किल्ल्यावर पहारा देखील जास्त नव्हता. त्याची डागडुजी करून स्वराज्याची राजधानी तो किल्ला बनवायचा असा मानस शिवरायांचा होता.

संधी साधून एके दिवशी तो किल्ला शिवरायांनी ताब्यात घेतला. तोरणा गडावर सापडलेले धन त्या गडाच्या डागडुजीसाठी वापरण्यात आले. त्या किल्ल्याला नाव देण्यात आले “राजगड”. काम जोरात सुरू झाले. राजवाडा, बारा महाल, अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. अत्यंत परिश्रमाने सजवलेला हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी ठरला. 

शिवरायांनी त्यानंतर मावळ प्रांतातील जवळजवळ सर्व किल्ले ताब्यात घेतले. त्या प्रांतातील देशमुख, पाटील सर्वजण मुजऱ्यासाठी येऊ लागले. शिवरायांची प्रसिद्धी त्या प्रांतात वाढली असतानाच काही लोकांनी आदिलशाही ठाणेदाराकडे तक्रारी केल्या. शिवरायांविरुद्धची सर्व हकीकत आदिलशाहच्या कानी पडली. 

आदिलशाहने प्रथम शहाजीराजांना बोलावून जाब विचारला. जहागिरी व्यवस्थित सांभाळण्यासाठी किल्ले ताब्यात असणे आवश्यक आहे त्यामुळे शिवबाने किल्ला घेतला असेल, असा आशय शहाजीराजांनी दिला. शिवरायांना या बाबतीत विचारले असता ते म्हणाले, ” ही सर्व कामगिरी आम्ही आदिलशाहीच्या विकासासाठी करतो आहोत. इथल्या जहागिरीची जबाबदारी आमच्या खांद्यावर असताना कारभार पाहण्यासाठी किल्ले ताब्यात हवेत. आदिलशाहीचे हित बघूनच आम्ही हा निर्णय घेतला.” 

कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. शिवराय आपली घोडदौड चालू ठेवतात आणि हे दोन किल्लेसुद्धा ताब्यात घेतात. त्यानंतर रोहिडा किल्ला जिंकतात. आसपासचे सर्व किल्ले ताब्यात घेत स्वराज्याची सत्ता वाढवण्याचे काम शिवराय चालू ठेवतात. 

स्वराज्याचे चलन : राजमुद्रा | Rajmudra meaning in Marathi |

छत्रपती शिवाजी महाराज पुणे हा प्रांत स्वतः चालवू लागल्यानंतर स्वराज्याची राजमुद्रा असली पाहिजे असे त्यांना वाटू लागले यानंतर त्यांनी राजमुद्रा अस्तित्वात आणली ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.

त्याच्यावरील लिखित भाष्य सर्वांना ज्ञात आहे. “प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे.” असा अर्थ असणारे राजमुद्रेवरील संस्कृत सुभाषित खालीलप्रमाणे,

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

• स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त!

शिवरायांना अनेक वेळा स्वकीय आणि स्वतःच्या आप्तेष्टांच्या त्रासाला सामोरे जावे लागे. स्वराज्याचे स्वप्न सर्वांना माहीत असताना काहीजण फितूर होतेच. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे दोन सरदार आदिलशाहीत सरदार म्हणून कार्यरत होते.

शिवरायांना लगाम घालण्यासाठी आदिलशाहने काही चाली खेळल्या. त्यापैकीच ही एक चाल होती. कोंढाणा परिसरात त्यांनी जनतेला सैरावैरा करून सोडले. शिवरायांनी त्यांचा बंदोबस्त करत हकलवून लावले. शिवरायांचे मेहुणे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्या विरोधातही सक्तीची पाऊले शिवरायांना उचलावी लागली. 

शिवरायांचा आणखी एक नातलग संभाजी मोहिते. त्याने सुपे परगण्यात शिवरायांविरूध्द मोहिमा राबवल्या. शिवरायांना हे कळताच त्यांनी संभाजीची पाठवणी कर्नाटक प्रांतात केली. जावळीचे यशवंतराव मोरे उर्फ चंद्रराव हेदेखील शिवरायांच्याविरुद्ध बंड करण्यात यशस्वी झाले. 

शिवरायांना ते राजे मानत नसत. दौलतराव मोरे हे जावळीचे जहागीरदार होते. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे जे जे वारसदार होते त्यांमध्ये वाटण्या सुरू झाल्या. परंतु शिवरायांनी यशवंतराव यांना मदत केली आणि खंडणी देण्याचा करार केला. यशवंतराव गादीवर बसल्यानंतर मात्र करार विसरले. आदिलशाहचा हात आपल्यावर आहे, शिवराय आपल्याला काही करू शकत नाहीत, असा त्याचा समज होता. 

आदिलशाहने त्यांना चंद्रराव ही उपाधी दिली होती. त्यामुळे त्यांना चंद्रराव मोरे म्हणून ओळखले जात असे. त्याची स्वारी जावळी प्रांत सोडून होत होती. बाकीच्या मुलुखांवर तो चालून जात होता. शिवरायांना त्याचा बंदोबस्त करण्याची गरज भासू लागली. त्याच्यापासून स्वराज्याला धोका आहे, हे शिवरायांनी हेरले होते. 

शिवरायांनी अगोदर समज म्हणून एक पत्र धाडले. त्याचे उत्तर म्हणून चंद्रराव मोरे यांनी शिवरायांनाच दरडावले. शिवरायांनी आणखी एक पत्र पाठवले त्यामध्ये बंडखोरी केली तर मारले जाल असे ठणकावून सांगितले. तरीही तो काही ऐकला नाही. त्याने बंड सुरूच ठेवले. अखेर शिवरायांनी जावळीवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. 

जावळीवर आक्रमण होताच चंद्रराव बिथरला पण त्याने जावळी प्रांतात निकराने विरोध केला. जवळजवळ एक महिना तो शिवरायांविरूध्द लढला. त्याचे खूप सैन्य मारले गेले. अखेर तो मजबूत अशा रायरी किल्ल्यावर लपून बसला. रायरी किल्ला खूप अवघड आणि घनदाट जंगलात वसलेला होता. त्यावर आक्रमण म्हणून अगोदर शिवरायांनी त्या गडाला वेढा दिला. 

चंद्रराव काही हार मानायला तयार नव्हता. त्याने तब्बल तीन महिने किल्ला लढवत जिकिरीचे सामर्थ्य दाखवले पण अखेर त्याला माघार घ्यावी लागली. रायरीचा किल्ला ताब्यात आल्यानंतर त्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. जावळीसारखा भला मोठा प्रांत जिंकणे म्हणजे स्वराज्याचे वाढते स्वरूप होते. त्यानंतर काही काळात भोरप्या डोंगरावर आणखी एक किल्ला बांधण्यात आला. त्याचे नाव “प्रतापगड” असे ठेवण्यात आले. 

शिवरायांचा प्रतापगडावरील पराक्रम | अफजलखानाचा वध ! शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din)

विजापूरला शिवरायांच्या हालचाली कळू लागल्या होत्या. गडकिल्ले जिंकत शिवराय स्वतः कारभार पाहू लागल्याची जाणीव विजापुरी दरबारात झाली होती. आदिलशाहीतील सर्व सरदार, बहादुर सेनानी, वजीर सर्वजण उपस्थित होते. शिवाजीला थांबवले पाहिजे, असा एकच प्रश्न सर्वांसमोर होता. 

बडी बेगम ( साहेबीन ) जातीने त्यावेळी दरबारात उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त?” सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. शिवाजी महाराजांची ख्याती सर्वदूर पसरू लागल्याने सह्याद्रीच्या कुशीत जाऊन शिवाजीचा बंदोबस्त करणे हे खूपच जिकिरीचे काम होते.

शेवटी अफजलखान नावाचा धिप्पाड सरदार पुढे आला. शिवाजीला जिवंत किंवा ठार मारून घेऊन येण्याचे वचन भर दरबारात अफजलखान देतो. सर्वांना त्याचा विश्वास बसतो कारण अफजलखानाची ताकद म्हणजे पोलादी! लोहाची हत्यारे आपल्या हातांनी वाकवणारा असा हा अफजलखान शिवरायांना पकडण्यासाठी स्वराज्यावर चालून येतो. 

यापूर्वी अफजलखान वाईचा सुभेदार असल्याने त्याला सह्याद्री हा प्रांत बऱ्यापैकी माहिती होता त्यामुळे महाराष्ट्र काही त्याला नवीन नव्हता. शिवराय राजगडावर असताना त्यांना ही बातमी कळली. खानाचा मुकाबला भर युद्धात आपण करू शकत नाही याची जाणीव शिवरायांना होती. शिवरायांचे सैन्य आणि राज्य लहान होते. त्याचा निभाव खानाच्या फौजेपुढे लागणे शक्य नव्हते. 

अफजलखानाशी मुकाबला हा युक्तीने होऊ शकतो अशी चर्चा शिवराय राजमाता जिजाऊंशी करतात आणि प्रतापगडावर रवाना होतात. शिवराय प्रतापगडावर गेल्यावर खान चांगलाच चिडला. त्याला भलेमोठे सैन्य प्रतापगडावर नेणे शक्य नव्हते. प्रतापगड डोंगरात वसला असल्याने तिथे पोहचणे म्हणजे चांगलेच अडचणीत आणणारे काम होते.

जंगली प्राणी आणि घनदाट वनराई असल्याने सैन्य फाटा प्रतापगडावर जाऊच शकणार नव्हता. शिवाजी महाराज स्वतः उतरून खाली यावे यासाठी खानाने रयतेचा छळ करण्यास सुरुवात केली. देवस्थाने उध्वस्त करण्यास सुरुवात केली. असे केल्याने शिवराय खाली येतील असा खानाचा समज खोटा ठरला. मोठा संयम दाखवत शिवाजी महाराजांची ही चाल यशस्वी ठरली. खानाने मग शिवरायांना भेटण्यासाठी संदेश पाठवला.

“आमचे किल्ले परत द्या आणि आदिलशाहीत सामील व्हा आम्ही तुम्हाला सरदारकी देऊ इच्छितो.” असा संदेश शिवरायांना कळताच ते आणखीनच सावध झाले. मोठ्या बुद्धीने परतीचा संदेश म्हणून शिवराय खानास घाबरतात आणि खानाने खुद्द शिवाजींना भेटण्यासाठी प्रतापगडावर यावे असे सांगितले. 

अफजलखान मोठमोठ्याने हसू लागला, “हा शिवाजी तर डरपोक निघाला. आम्ही त्याच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या कथा खोट्या होत्या, आम्हीच जातो त्याला भेटायला आणि चिरडून टाकतो,” असे म्हणत खान “प्रतापगडावर भेटू!” असा संदेश पाठवतो. प्रतापगड येथील खालची माची येथे भेटण्याचा बेत ठरला. 

भेटीच्या वेळी दोघांचेही एक एक अंगरक्षक सोबत असतील आणि बाकीचे अंगरक्षक शामियान्याच्या बाहेर असतील असे ठरले. छान असा शामियाना उभारण्यात आला. भेटीची वेळ ठरवण्यात आली. आपल्याबरोबर काही दगा झाला तर किल्ल्यावरील बाकीचे सैन्य आक्रमण करेल आणि अफजल खान देखील माघारी जाता कामा नये, याची पुरेपूर व्यवस्था शिवाजी महाराज करतात.

भेटीचा दिवस उजाडला. शिवराय भवानी देवीचे दर्शन घेतात. अंगात चिलखत, डोक्यावर जिरेटोप आणि पट्टा, वाघनखे आणि बिचवा अशी शस्त्रे शिवराय परिधान करत त्यावरून आपला पोशाख चढवतात. सर्व सरदार आणि सेवकांना सूचना देत शिवराय भेटीसाठी तयार झाले. शामियान्यात जिवाजी महाला याला शिवराय सोबत नेण्याचा बेत करतात. अफजलखान बडा सय्यद नामक आपल्या सेवकासोबत बसलेला असतो. 

शिवराय शामियान्याच्या दाराशी येऊन थांबतात. “शिवाजी आत का येत नाही?” असे अफजलखान महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ यांना विचारतात. “शिवाजी राजे बडा सय्यदला घाबरतात”, असे उत्तर मिळताच बडा सय्यद थोडा दूर झाला. “या राजे, भेटा आम्हाला.” असे म्हणत अफजलखान उभा राहतो. 

अफजलखान शिवरायांना आलिंगन देण्याच्या उद्देशाने पुढे सरकतो. शिवराय त्याचे आलिंगन स्वीकारतात. शिवराय अफजलखानापुढे खूपच लहान होते. त्यांना मिठीत घेऊन चिरडून टाकावे असा मनसुबा खानाचा होता. शिवराय मिठीत येताच त्यांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. अंगात चिलखत असल्याने शिवराय बचावले. प्रसंगावधान राखून शिवरायांनी वाघनख्या आणि बिचवा काढून अफजलखानाचा पोटळा बाहेर काढला. 

खानाचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे सरसावताच एका पट्ट्याच्या वारातच शिवराय त्यांना ठार करतात. सय्यद आता वार करणार एवढ्यात जिवाजी महालाने त्याला ठार केले. संभाजी कावजी, जिवाजी महाला आणि शिवराय हे तिघे या संघर्षात सहभागी होते. या घटनेनंतर “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली. 

शिवरायांनी केलेली विजयी सूचना सगळे मावळे ऐकतात आणि खानाच्या फौजेवर तुटून पडतात. अफजलखानाचा मुलगा फाजलखान या चकमकीत निसटतो आणि विजापूरला पोहचतो. विजापूरच्या दरबारात एवढ्या बलाढ्य सरदाराचा मृत्यू संपूर्णपणे हाहाकार उडवून देतो. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आता सर्वदूर पसरू लागली होती.  

पावनखिंड आणि बाजी प्रभूंचा पराक्रम | Baji Prabhu Deshpande | Pavan khind Battle |

अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाही पुरती हादरली होती. आदिलशाहाच्या ताब्यातील पन्हाळागड जिंकल्यावर तर आदिलशाह भयंकर चिडला. शिवरायांचा बिमोड करण्यासाठी सिद्दी जौहर आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान हे दोघे भले मोठे सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून आले. 

सिद्दी जौहर शिस्तप्रिय सरदार होता. त्याने जास्त गाजावाजा न करता पन्हाळगडाला वेढा दिला. शिवरायांना कोंडीत पकडले. हा वेढा उठता उठेना. पावसाळा सुरू झाला तरी वेढा काही उठण्याचे नाव घेईना. शक्तीचा उपयोग कामी येणार नव्हता. सिद्दीने यावेळी खूपच संयम दाखवला होता. 

“लवकरच किल्ला माघारी देतो” असा निरोप शिवरायांनी सिद्दीला धाडला. शिवाजी शरण येतो आहे असे समजताच त्याचे सैन्य थोडे ढिले पडले. अनेक दिवसांचा वेढा आता सैल होऊ लागला होता. आता शिवरायांनी युक्ती लढवली. गडावरून निसटण्यासाठी दोन पालख्या तयार करण्यात आल्या. एका पालखीतून शिवराय स्वतः अवघड मार्गाने बाहेर पडणार, त्याअगोदर एक पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार ज्यामध्ये शिवरायांसारखा वेष धारण केलेला व्यक्ती बसलेला असणार. 

शिवा काशिद हा तरुण हुबेहूब शिवरायांसारखा दिसत असे. केशभूषा करणारा हा सेवक हे धाडसी कृत्य करण्यास तयार झाला. रात्रीच्या वेळेस राजदिंडी दरवाजातून एक पालखी बाहेर पडली. पहारेकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ती पालखी पकडून “शिवाजी महाराज सापडले” असा गाजावाजा केला. सिद्दी जौहरकडे ही पालखी नेण्यात आली. तेव्हा दुसऱ्या मार्गाने शिवराय आणि निवडक बांदल-देशमुख सैन्य आणि सोबत बाजीप्रभू देशपांडे निसटण्यात यशस्वी झाले. 

सिद्दी जौहर हुशार होता. त्याने शिवा काशीदला लगेच नकली असल्याचे ओळखले. शिवा काशिद ठार मारला गेला. त्याचे बलिदान अजरामर ठरले. शिवराय निसटले असे समजताच सिद्दी पेटून उठला. त्याच्या सैन्याने शिवरायांचा पाठलाग सुरू केला. शिवराय संकटात सापडले. सिद्दीचे भले मोठे सैन्य मागावर होते. 

घोडखिंडीत शिवराय बाजी प्रभुंशी सल्ला मसलत करतात, तेव्हा बाजीप्रभू शिवरायांना विशाळगड गाठण्यासाठी विनंती करतात. घोडखिंड अडवून निकराने लढा देऊ असे वचन बाजीप्रभू शिवरायांना देतात. गडावर पोहचल्यावर शिवराय तोफांचे आवाज करण्याचे सूचित करतात आणि तोफांचा आवाज येताच ताबडतोब खिंड सोडून तुम्ही विशाळ गडावर निघून या! असे शिवराय सांगतात आणि पुढची वाटचाल सुरू ठेवतात.

खिंडीतील वाट बिकट होती. शत्रू सैन्य एकदम चालून येणे शक्य नव्हते. खिंडीच्या तोंडावर बाजीप्रभू आपले सैन्य उभे करतात आणि स्वतः समशेर घेऊन लढण्यासाठी सज्ज होतात. शत्रू खिंड चढू लागला होता. मावळे शत्रूंवर तुटून पडतात. “हर हर महादेव” अशा गर्जनेत पहिल्या तुकडीला तर दगड गोट्यांनी मावळे ठेचून काढतात. 

सिद्दी मसूद (मसउद) हा सेनापती आता चिडला होता. त्याने कशाचीही पर्वा न करता बाजीप्रभूंना प्रथम घेरले. इतर मावळे प्रतिकार करतच होते. बाजींना एवढ्या जणांचा प्रतिकार पुरेसा ठरत नव्हता. शत्रूंना प्रत्येक घावानिशी धारातीर्थी पाडणारे बाजीप्रभू अतुल्य शौर्य गाजवत होते. अंगावर घणाघाती वार सहन करत बाजींचे लक्ष मात्र तोफांच्या आवाजाकडे होते. 

तोफांचा आवाज झाला. बाजीप्रभू आता सुखावले. “महाराज गडावर पोहचले, आता मी सुखाने मरू शकतो.” असे शब्द बाजीप्रभूंचे शेवटचे शब्द ठरले. स्वामीभक्त बाजीप्रभू यांनी शर्थीने खिंड लढवली. त्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणून घोडखिंडीला नाव देण्यात आले पावनखिंड!

शायिस्ते खान आणि छ.शिवाजी महाराज चकमक | Shayista Khan and Shivaji Maharaj Encounter |

आदिलशाही आता पुरती नरमली होती. शिवरायांचे स्वतंत्र राज्य मान्य करीत आदिलशाह दक्षिण विभाग सांभाळून होता. आता शिवराय मुघलांकडे वळले. महाराष्ट्रातील कित्येक प्रांत हे मुघलांच्या आक्रमणाने त्रस्त होते. शिवरायसुद्धा मग अनेकवेळा मुघल प्रांत जिंकून घेत असत. मुघल बादशाह औरंगजेब आता चिडला आणि त्याने आपला मामा शायिस्तेखान याला स्वराज्यावर आक्रमण करण्यास सांगून त्याची भल्यामोठ्या सैन्यानिशी पाठवणी केली.

प्रथम पुरंदरचा वेढा हा शायिस्तेखानाची चाल होती. परंतु मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे खानाचे सैन्य त्रस्त झाले होते. पुरंदरला घातलेला वेढा अखेर उठवला गेला. मग शायिस्ते खान पुण्याकडे वळला. त्याने चाकणचा किल्ला घेतला नंतर पुण्याच्या लाल महालात त्याने तळ ठोकला. तेथील जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली.

शायिस्ते खानाची खोड मोडायची असे शिवराय ठरवतात. लाल महाल हा लहानपणापासून शिवरायांना परिचित होता. त्यापद्धतीने मग नियोजित आक्रमण करण्याचा बेत शिवराय ठरवतात. मध्यरात्री लाल महालात शिरून खानाला पकडायचे असा मनसुबा शिवरायांचा होता. महालात शिरणे हे खूप अवघड काम होते. हजारोंचे सैन्य अवतीभोवती पसरले होते तसेच महालात देखील कडक सुरक्षा होती. 

आक्रमणाची तयारी झाली. ५ एप्रिल १६६३ रोजी रात्री शिवराय आपल्या निवडक साथीदारांसोबत लाल महालाच्या दिशेने चालून जातात. स्वतःचाच वाडा असल्याने शिवरायांना त्यातील सर्व जागा माहीत होत्या. एका भिंतीला भगदाड पाडून शिवराय आणि साथीदार आत शिरतात. सुरक्षा सेवकांवर मात करीत शिवराय खानाला शोधत पुढे सरसावत होते. एका खोलीत शायिस्ते खान झोपला होता. 

कोणीतरी आलंय याची जाणीव शायिस्ते खानाला झाली. जाग येताच शिवराय समोर दिसतात. आपला मृत्यू समोर दिसताच, आहे त्या स्थितीत भर वेगाने शायिस्ते खान इकडे तिकडे पळत सुटतो. खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न खान करतो आणि त्याची बोटे शिवराय कापतात. त्याच्यावर झालेला तलवारीचा वार तो त्याच्या बोटांवर निभावून जातो. 
“शिवाजी आला, शिवाजी आला” असे म्हणत सर्वजण पळत सुटतात. त्यात स्वतः शिवराय देखील सामील असतात.

शिवराय त्यानंतर सिंहगडाकडे निघून जातात. शायिस्ते खानाला मारण्याचा प्रयत्न तर फसतो. परंतु शिवरायांचा धाक मात्र मुघल सत्ता चांगलीच अनुभवत असते. औरंगजेबाला ही बातमी कळल्यावर तो चांगलाच बिथरतो. या घटनेनंतर शायिस्ते खानाची रवानगी बंगालला केली जाते. 

पुरंदरचा तह । Purandarcha Tah

मुघल साम्राज्याचा त्रास महाराष्ट्रात वाढत चालला होता. त्याला लगाम घालण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटायची ठरवले. सुरत ही त्यावेळची खूप मोठी व्यापार पेठ होती. सुरतेच्या खजिन्यावर छापा मारला गेला. औरंगजेब भयंकर चिडला. मराठ्यांचे राज्य आणि शिवराय यांचा हिशोब लावलाच पाहिजे असा निर्णय औरंगजेब बादशहाने घेतला. 

मुघल बलाढ्य सरदार मिर्झाराजे जयसिंग यांना स्वराज्यावर चालून पाठवले. त्यांच्याबरोबर दिलेरखान या सरदाराला धाडले. जयसिंग आणि दिलेरखान आता प्रचंड दारूगोळा आणि फौज घेऊन दक्षिणेकडे वाटचाल करू लागले. शिवराय सुरतेच्या मोहिमे वरून परतताच त्यांना शहाजीराजे निधन पावले अशी बातमी समजते. ते वर्ष म्हणजे १६६४ चे होते. या घटनेचे जिजाऊ, शिवराय आणि स्वराज्यातील प्रत्येक शिलेदाराला प्रचंड दुःख झाले. 

पुरंदरला वेढा आणि मुरारबाजींचा पराक्रम Murarbaji Parakram ।

पुरंदर हा भला मोठा गड! मजबूत आणि तेवढाच प्रचंड! हा किल्ला आपल्या हाती आलाच पाहिजे या हेतूने दिलेरखान या किल्ल्याला वेढा देतो. त्याची फौज मोठी होती. त्यावेळी पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे! मुरारबाजी हा मोठा शूर होता. त्याच्या हाताखालचे मावळे हे देखील पराक्रमी होते. 

दिलेरखानाच्या तोफा आसमंतात गरजू लागल्या. तोफांचे गोळे किल्ल्यावर धडकू लागले. माचीचा बुरुज ढासळला. मुघल किल्ल्यावर चढाई करतच होते. दिलेरखान हा स्वतःच्या छावणीत बसून हे सर्व दृश्य पाहत होता. मराठे आता वरच्या बालेकिल्ल्याचा आधार घेऊन लढत होते. स्वतः आक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही असा विचार करून मुरारबाजी पेटून उठला. 

“हर हर महादेव” या एकाच गर्जनेने सर्व मावळ्यांना सोबत घेऊन मुरारबाजी बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडत मुघल फौजेवर तुटून पडतो. तुंबळ युद्ध सुरू होते. या भयंकर लढाईत मराठे मुघल फौजेचा धुव्वा अडवते. सर्व मुघल सेना दिलेरखानाच्या छावणीच्या दिशेने पळत सुटले. मुरारबाजी आता काही माघार घेणार नव्हता. तो देखील छावणीमध्ये घुसला. 

छावणीत एकच जल्लोष आणि ललकार गाजला. दिलेरखान हत्तीच्या अंबारित जाऊन बसला. मुरारबाजीची तलवार तळपत होती. सापडेल त्याला कापत होती. मुघल सैन्य थोड्याशा मावळ्यांपुढे हतबल झाले होते. मुरारबाजी आता दिलेरखानाच्या दिशेने जाऊ लागला, तोच दिलेरखानाने त्याला मुघलांची चाकरी देऊ केली पण ती चाकरी मुरारबाजी नाकारत आक्रमण सुरूच ठेवतो. 

दिलेरखान हत्तीच्या अंबारित बसला असल्याने त्याला बाण चालवणे सोप्पे गेले. त्याचा एक बाण मुरारबाजींचा प्राण हेरून गेला. मुरारबाजी धारातीर्थी पडला. तरीही मावळे काही माघारी हटले नाहीत. त्यांचा पराक्रम पाहून मुघल सैन्य अचंबित झाले होते. शेवटी मराठी मावळे देखील वीरगतीला प्राप्त झाले.

आता असेच चालू राहिल्यास स्वराज्य उभे राहू शकत नाही असा विचार करून शिवराय तह करण्याचे ठरवतात. शिवराय स्वतः मिर्झाराजे यांची भेट घेतात. स्वतःचा मनसुबा आणि स्वराज्याच्या हिताचे काम हाती घेतल्याचे देखील शिवराय समजावतात. मिर्झाराजे सर्व मान्य करतात पण तह करण्याचे सांगतात. त्या तहात ठरल्याप्रमाणे तेवीस किल्ले व त्याखालील चार लक्ष होनांचा मुलुख देण्याचे शिवराय मान्य करतात. 

“बादशाह तुम्हाला भेटून खुश होतील. नक्की बादशाहच्या भेटीला जा!” असे मिर्झाराजे शिवरायांना सुचवतात. मिर्झाराजे आणि दिलेरखान यांचे आक्रमण परतवण्यासाठी आणि स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी शिवराय बादशाहभेटीचा प्रस्ताव मान्य करतात आणि त्यासाठी स्वतः आग्र्याला जाऊन बादशाहची भेट घेऊ असे जयसिंग यांना कळवतात. 

छ.शिवाजी महाराज आणि बादशाह औरंगजेब आग्र्याची भेट | बादशाहच्या हातावर तुरी !Shivaji Maharaj and Baadshah Aurangzeb

मिर्झाराजे यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन शिवराय बादशाह भेटीसाठी आग्र्याला पोहचतात. स्वतःबरोबर बाल संभाजीराजे आणि निवडक सरदारांना शिवराय आग्र्याला आलेले असतात. भेटीचा दिवस उजाडतो. त्या दिवशी बादशाह औरंगजेबचा पन्नासावा वाढदिवस असतो. बादशाह आता सर्व सरदार आणि शिवरायांच्या भेटीसाठी महालात येतो. 

सर्व सरदार मानाप्रमाने उभे केलेले असतात. त्यातच मराठ्यांना भिऊन अनेक वेळा परतलेला जसवंतसिंग राठोड हा सरदार शिवरायांच्या पुढे उभा असतो. शिवरायांना हा अपमान सहन झाला नाही. शिवरायांना वाटले, आपला मान बादशाहच्या बरोबरीचा आहे. आम्हीही राजे आहोत. आम्हाला सरदार समजले की काय? शिवराय रागारागाने तिथून निघून आपल्या निवासस्थानी येतात. घडलेला प्रसंग सर्वदूर पसरतो.

औरंगजेब ही संधी दवडणार नव्हता. त्याने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पहारा वाढवला. शिवरायांना कळून चुकले की आपण आता कैद झालो आहोत. औरंगजेब आपल्याला काही सोडणार नाही. शिवराय स्वराज्यात परतण्यासाठी अर्जही करतात पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काहीही झाले तरी कैदेतून सुटलेच पाहिजे असा विचार करून शिवराय अगोदर निवडक साथीदारांना दक्षिणेत पाठवण्याची परवानगी मागतात. आता फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर एवढेच जण तेथे राहणार होते. 

शिवराय आणखीनच हतबल होतील, अशा विचाराने औरंगजेब लगेच ती परवानगी देतो. त्यानंतर शिवराय आजारी असल्याचे ढोंग करतात. पोटात प्रचंड दुखत असल्याचे सोंग ही करतात. आजार बरा व्हावा म्हणून अनेक उपचार सुरू झाले पण शेवटी ढोंगच असल्याने आजार कसा काय बरा होईल!

आजार काही बरा होत नाहीये. आता साधू महात्म्यांच्या आशीर्वादाने बरा झालो तर झालो असा संदेश बादशाहकडे पाठवून साधू मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास शिवराय सुरुवात करतात. बादशाह परवानगी देतो पण मिठाईचा पेटारा जाताना व्यवस्थित तपासण्याचा आदेशही देतो. मिठाईचे पेटारे दररोज पाठवले जात होते. आता पहारेकरी पेटारे तपासून कंटाळले होते. ते सर्व पहारेकरी आता पेटारा उघडतही नसत.

शिवरायांना संधी सापडली. त्यांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले आणि मदारीला त्याची सेवा करण्यास सांगितले. एक पेटारा उघडून शिवराय त्यात बसतात आणि संभाजीराजे दुसरा पेटारा उघडून त्यामध्ये बसतात. पेटारे सुरक्षित ठिकाणी पोहचल्यानंतर शिवराय आणि संभाजीराजे बाहेर पडतात. विश्वासू साथीदार घोडे घेऊन आलेले असतात. इकडे हिरोजी आणि मदारी औषध आणायला जातो असे म्हणून तेही दोघे तिथून पळ काढतात. 

औरंगजेब बादशाहला ही बातमी समजताच त्याची तळपायाची आग मस्तकात शिरते. सर्वजण हतबल होऊन एकमेकांकडे बघत राहतात. पूर्णपणे वेष बदलून शिवराय पुढची वाटचाल करीत असतात. वाटेत दगा होऊ नये म्हणून शिवराय संभाजीराजेंना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवतात. शिवराय थेट राजगडावर पोहचतात. दोन महिन्यांनी संभाजीराजे देखील राजगडावर सुखरूप येतात. अशा प्रकारे बादशाहाच्या हातावर तुरी देण्यात शिवराय यशस्वी झाले होते. 

गड आला पण सिंह गेला | तानाजी मालुसरे यांचा पराक्रम! Tanaji Malusare Information, Battle |

मिर्झाराजे जयसिंग यांस दिलेले तेवीस किल्ले परत घेण्याची वेळ आली होती. मोठमोठे आणि प्रचंड बळकट किल्ल्यांचा त्यामध्ये समावेश होता. कोंढाणा हा देखील त्यापैकीच एक! जिजाऊ माता कोंढाणा काबीज करण्याचा आग्रह शिवरायांसमोर ठेवतात. पुण्याजवळच हा किल्ला असल्याने स्वराज्यातच तो असला पाहिजे असे राजमाता जिजाऊंना वाटत होते.कोंढाणा हा अडचणीचा किल्ला होता. कोंढाणा   जिंकणे अवघड काम होते. 

तानाजी मालुसरे हा शिवरायांचा निष्ठावंत साथीदार! अगदी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासून तानाजी शिवरायांसोबत होता. कोकणात महाडजवळ असणारे उमरठे हे त्याचे गाव! तानाजीचा मुलगा रायबा. रायबाचे लग्न करायचे ठरले होते. लग्न अगदी चार दिवसांवर येऊन ठेपले होते. महाराज आणि जिजाऊंना लग्नासाठी आमंत्रण दिले पाहिजे या हेतूने तानाजी स्वतः आणि शेलारमामा शिवरायांकडे येतात.

कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी शिवरायांनी स्वतः जातीने घेतली असल्याने शिवराय लग्नाला येण्यास नकार कळवतात. तानाजी मालुसरे ताडकन उत्तर देतात,”हा तानाजी जिवंत असताना शिवाजींनी कामगिरी फत्ते पाडायची? कोंढाणा हा असा जिंकून स्वराज्यात सामील करवून घेतो.” शिवराय आणि जिजामाता रायबाचे लग्न उरकून घ्या असा सल्ला देतात परंतु तानाजी त्यावर म्हणतात,”आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे!”

कोंढाणा किल्ल्यावर उदेभान नावाचा किल्लेदार होता. तो ही मोठा पराक्रमी होता. गडाला दोन दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी पक्का बंदोबस्त होता. पश्चिमेला असलेल्या उंच कड्यावरून गडावर गेल्यास फायदेशीर ठरेल, कारण तेथे कोणताच पहारा नव्हता. असा बेत ठरल्यानंतर तानाजी आपला धाकटा भाऊ सुर्याजीला कल्याण दरवाजावर पाचशे मावळे सोबत देऊन पाठवतो. स्वतः तानाजी तीनशे मावळे घेऊन कड्यावरून चढाई करण्याचे ठरवतो. 

वेळ रात्रीची होती. उंच कडा चढण्यासाठी मोठ्या हिमतीची गरज होती. निवडक मावळे कड्यावरून चढू लागले. वर पोहचल्यावर त्यांनी दोर झाडाला बांधला. दोराचे दुसरे टोक खाली सोडले. त्यावरून तानाजी आणि सर्व मावळे कडा सर करून गेले. गडावर पोहचताच आक्रमण सुरू झाले. उदेभान जागा झाला. सर्व सैनिक सुद्धा जागे झाले. सूर्याजी तिकडे दरवाजावर वाट पाहत उभा होता. मावळ्यांनी तो दरवाजा उघडला. सूर्याजी आणि पाचशे मावळे देखील तुटून पडले. एकच गोंधळ, एकच जल्लोष उडाला. 

हर हर महादेवच्या गर्जना होऊ लागल्या. तलवारी आणि ढाली एकत्र खणाणू लागल्या. उदेभान आणि तानाजी आता एकत्र भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. दोघेही मोठे पराक्रमी वीर! तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शाल गुंडाळून युद्ध सुरू ठेवले. दोघेही एकमेकांच्या विरोधात जबर जखमी झाले. दोघेही धारातीर्थी पडले. तानाजी मालुसरे पडला. आपला सरदार पडला म्हणून मराठी मावळे सैरावैरा झाले. 

आता सूर्याजी तिकडून दाखील झाला. त्याने पुन्हा मावळ्यांना एकत्र लढण्यासाठी प्रवृत्त केले. पळून जाऊन काहीही उपयोग नाही. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. “आता कड्यावरून उडी मारून मरा किंवा लढून मरा! आपल्याला ही लढाई जिंकलीच पाहिजे.” असे म्हणत पुन्हा एकदा तुंबळ युद्ध सुरू झाले. मावळ्यांचा हा पराक्रम त्यांना विजय देऊन गेला. गड आता मराठ्यांनी काबीज केला. 

तानाजी मालुसरे गेल्याची बातमी कळताच जिजाऊ आणि शिवरायांना प्रचंड दुःख झाले. सिंहासारखा शुर गडी धारातीर्थी पडला. कोंढाणा काबीज झाला पण तानाजीला गमावला या दुःखात शिवरायांचे उद्गार खूप मोलाचे ठरले, “गड आला पण सिंह गेला!” तानाजीच्या सिंहासारख्या पराक्रमाचा कोंढाणा गड साक्षीदार होता. त्यानंतर कोंढाण्यास नाव देण्यात आले सिंहगड! ही घटना १६७० मध्ये घडली. उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न लावून दिले. 

शिवरायांचा राज्याभिषेक ! Shivaji Maharaj Rajyabhishek

स्वराज्याची प्रतिज्ञा पूर्णत्वाला आली होती. स्वतंत्र स्वराज्य उभे राहिले होते. अनेक मावळ्यांना स्वतःचे प्राण त्यासाठी गमवावे लागले होते. अनेक प्रांतप्रदेशात महाराष्ट्र देखील उठून दिसावा आणि स्वतंत्र मराठा स्वराज्य असल्याचे सर्वांनी मान्य करावे यासाठी शिवराय स्वतःचा राज्याभिषेक घेण्याचे ठरवतात. मराठी रयतेचा स्वराज्यधिष्ठीत राजा म्हणून एकदा घोषणा झाली की मग सर्व परकीय सत्ता आक्रमण करताना दहावेळा विचार करतील आणि स्वराज्याची स्वतंत्र कार्य व्यवस्था देखील राबवता येईल, असा विचार शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा घेण्यामागे होता. 

शिवरायांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. स्वराज्य सांभाळणे आणि शत्रूंचा बिमोड करणे रायगडावरून खूपच सोप्पे होते. राज्याभिषेक सोहळ्यासाठी सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले. अनेक सरदार, राजे, मावळे, विश्वासू साथीदार, ब्राम्हण पंडीत अशा सर्वांना निमंत्रणे धाडण्यात आली. राज्याभिषेक करण्यासाठी काशीचे प्रसिद्ध पंडित गागाभट्ट यांना बोलावण्यात आले. 

राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. असंख्य लोकांची गर्दी जमली होती. वाद्य वृंद वाजू लागले. गवई गाऊ लागले. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्या शिरावर छत्रचामरे धरण्यात आली. गागाभट्ट स्वतः सोन्याचा कलश आणि त्यात सात पवित्र नद्यांचे पाणी घेऊन उभे होते. शिवरायांच्या डोक्यावर ती घागर धरण्यात आली. गागाभट्ट मंत्र म्हणू लागले. घागरीच्या छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला.

 राजमाता जिजाऊ आणि शिवरायांचे स्वप्न तसेच अखंड मराठी मनाचे स्वप्न साकार झाले होते. स्वराज्याला पहिला छत्रपती राजा शिवाजी मिळाला होता. जलाभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज जिजाऊंना भेटले. त्यानंतर सिंहासनावर बसताच सर्व उपस्थित रयतेने “शिवाजी महाराज की जय!” असा एकच जयघोष केला. गागाभट्ट यांनी सोन्यामोत्याची झालर असणारे छत्र शिवरायांच्या डोक्यावर पकडले आणि “क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो”, असा जयजयकार केला.

हा राज्याभिषेक १६७४ मध्ये करण्यात आला. निरनिराळ्या प्रदेशाचे वकील आणि राज्यकर्ते या समारंभास उपस्थित होते. इंग्रजांनी ऑक्सिंडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. शिवरायांची किर्ती आता सर्वदूर पसरली होती. 

शिवरायांची दक्षिण मोहीम! 

राज्याभिषेकानंतर, काही काळानंतर राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले. शिवरायांचा खरा मार्गदर्शक आणि गुरू हरपला. आता स्वराज्य रक्षण आणि विस्तार गरजेचा होता. कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचे शिवरायांनी ठरवले. आदिलशाही आता अगोदर होती तेवढी मजबूत राहिली नव्हती. मुघल आक्रमण थोपवून धरणे आणि लढा देणे त्यासाठी दक्षिण भारतातला विस्तार गरजेचा होता. 

शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांची जहागिरी देखील त्यांच्याकडेच होती. त्यातील थोडासुद्धा वाटा शिवरायांना देऊ केला नव्हता. शिवरायांशी त्याचे मतभेद होते. तरीही त्याची भेट घेऊन स्वराज्य वाढीसाठी काही मदत झाली तर चांगलेच होईल, असा हेतू ठेऊन शिवराय स्वारीस निघाले. 

दक्षिण दिग्विजय करण्याअगोदर गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने शिवरायांना भेटण्याचे निमंत्रण दिले. शिवरायांनी ते स्वीकारले. गोवळ कोंड्यात प्रवेश होताच शिवरायांचे जंगी स्वागत झाले. शिवरायांची किर्ती सर्वदूर पसरली होती. सर्व प्रजा स्वराज्याच्या राजाला बघण्यासाठी आतुरली होती. कुतुबशहाने राजांच्या सेवेत कोणतीच कमी पडू दिली नाही. या भेटीनंतर शिवराय दक्षिण मोहिमेसाठी निघाले. 

चेन्नईच्या दक्षिणेस असणारा जिंजीचा किल्ला रायगडाप्रमाणे प्रचंड आणि मजबूत होता. त्याला वेढा देऊन तो गड प्रथम शिवरायांनी ताब्यात घेतला. त्यानंतर वेलुरचा किल्ला कित्येक महिन्यांच्या परिश्रमानंतर जिंकला. कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकत शिवरायांनी स्वराज्याच्या सीमेत नक्कीच वाढ केली होती.

 महाराजांनी त्यानंतर व्यंकोजी राजांची भेट घेण्याचे ठरवले. व्यंकोजी राजे स्वतः राजांच्या भेटीस आले. काही दिवस शिवरायांबरोबर व्यंकोजी राहिले. स्वराज्यकार्यात व्यंकोजी राजांची मदत असावी, असा प्रस्ताव देखील शिवरायांनी अनेक वेळा व्यंकोजी समोर ठेवला. व्यंकोजी राजे तरीही शिवरायांवर नाराज होते आणि एक दिवस काहीही न बोलता तिथून निघून गेले. याउलट शिवरायांच्या फौजेवर त्याने पलटून हल्ला केला. शिवरायांनी यावेळेस त्याचा चांगलाच समाचार घेतला. त्याचा पराभव करीत त्याची जागा दाखवून दिली. शिवराय दक्षिण मोहीम गाजवून रायगडावर परतले. त्यानंतर लगेच जंजिऱ्याच्या सिद्दी विरूध्द आरमारी मोहिमेसाठी शिवरायांना जावे लागले. 

शिवराय अथक पस्तीस वर्षे स्वराज्य निर्मितीसाठी लढले. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यांची गाथा सर्वत्र ऐकली जाऊ शकत होती. रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. एक महान आणि थोर राष्ट्रपुरुष म्हणून त्यांची ख्याती तेव्हाही होती, आजही आहे आणि भविष्यातही असेल. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे. या महान राजास त्रिवार मुजरा!

छत्रपती शिवाजी महाराज माहिती (Chhatrapati Shivaji Maharaj Information in marathi) व त्यांच्या जीवनावरील हा लेख तुम्हाला कसा वाटला? नक्की कळवा. शिवाजी महाराजांबद्दल इतर माहिती हवी असल्यास पुढील लिंक्सवर क्लिक करून ती माहिती मिळवा.

वाचा शिवजयंती बद्दल संपूर्ण माहिती!
शिवप्रताप दिन संपूर्ण माहिती

The post छत्रपती शिवाजी महाराज माहिती । Shivaji Maharaj Information in Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-information-in-marathi/feed/ 1 1698
Pu la Deshpande Information in Marathi | पु. ल. देशपांडे – हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व ! https://dailymarathinews.com/pu-la-deshpande-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/pu-la-deshpande-information-in-marathi/#respond Tue, 24 Mar 2020 01:18:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=1574 पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे भाई या टोपण नावाने ओळखले जातात. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके पुल. साहित्य आणि कला क्षेत्रातील ...

Read morePu la Deshpande Information in Marathi | पु. ल. देशपांडे – हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व !

The post Pu la Deshpande Information in Marathi | पु. ल. देशपांडे – हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व ! appeared first on Daily Marathi News.

]]>
पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे भाई या टोपण नावाने ओळखले जातात. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके पुल. साहित्य आणि कला क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून पुलंची ओळख आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात मराठी लेखक, नाटककार, कथाकार, पटकथाकार, नट, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक असे विविध आयाम प्रकट केले. 

• नाव – पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
• टोपणनाव – पु.ल., भाई 
• जन्म – ८ नोव्हेंबर १९१९, मुंबई.
• मृत्यू – १२ जुन २०००, पुणे.
• वडील – लक्ष्मण त्र्यंबक (त्रिंबक) देशपांडे
• आई – लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे
• पत्नी – सुनिता देशपांडे ( लेखिका आणि अभिनेत्री)

पु. ल. देशपांडे जवळजवळ प्रत्येक कलेच्या क्षेत्रात कार्यरत होते. शिक्षक, लेखक, नट, गायक, नकलाकार, पेटीवादक, वक्ते अशा कितीतरी उपाध्या त्यांना दिलेल्या आहेत. मराठी भाषेवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांचे भाषण सुरू झाले किंवा एखादे पुस्तक वाचले तर त्यांचे भाषाप्रभुत्व दिसून येते. 

मराठीत त्यांच्यावर भाई हा चित्रपट बनलेला आहे. त्यांची विनोदी बुद्धी त्यांच्या लेखनातून दिसून येते. प्रसिध्द लेखक मार्क ट्वेन प्रमाणे त्यांचे विनोदी किस्से प्रसिध्द आहेत. त्यांचे एक भावलेले वाक्य पाहा – ” लोक हसतात… माझ्या डोळ्यांत आतल्याआत कृतज्ञतेचे पाणी येते, आणि म्हणूनच अंगाला ‘अहंकाराचा वारा’ लागत नाही. ” वसंत सबनीस यांच्या मिश्किल प्रश्नावर दिलेल्या उत्तरातील हे एक वाक्य आहे. 

पुलंचा जन्म मुंबईत गावदेवी परिसरात झाला. त्यांचे लहानपण जोगेश्वरी येथे गेले. तेथे ते सारस्वत कॉलोनीत राहत असत. त्यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात झाले. त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झाले. त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले.
१९४६ साली त्यांचा सुनीताबाईंशी विवाह झाला. मराठी साहित्य लेखन आता ते करू लागले होते. त्याव्यतिरिक्त ते संगीत दिग्दर्शक म्हणून ही प्रसिध्द होत होते. त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शन, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातही काम केलेले होते.

पुलंचे वडील लक्ष्मण देशपांडे हे अडवाणी कागद कंपनीत कामाला होते. लहानपणापासून  पुल व्याख्यान देण्यात पटाईत होते. आजोबांनी लिहून दिलेले भाषण त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी स्वतःच्या धारधार आवाजात आणि हावभाव करून सादर केले होते. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत ते वक्तृत्व कलेत निपुण झालेले होते. त्यानंतर ते स्वतःची भाषणे स्वतःच लिहू लागले. संवादलेखन देखील करू लागले. पुलंना वाचन करणे आणि रेडिओ ऐकणे आवडत असे. 

लहानपणीच त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. ते पेटी वाजवायला शिकले. त्यांनी अनेक रचना आणि कवितांना चाली देखील लावल्या होत्या. ते नकला करण्यात पटाईत होते. सगळ्या व्यक्तींच्या हास्यास्पद नकला करणे हा त्यांचा छंद होता. घरी पाहुणे असताना पुल घरी नसलेलेच बरे असे त्यांच्या घरच्यांना वाटत असे. 

संगीताची साथ त्यांनी आता पकडली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर ते पेटीवादन आणि गाण्यांना चाली लावू लागले. कॉलेज जीवनात ते पेटी वाजवत गायकांना साथ देत. त्यांचा भाऊ रमाकांत तबला वाजवत असे. त्यावेळी मधुकर गोळवलकर सारंगी वाजवत असत. जेवढे पैसे मिळतील, ते पैसे तिघे वाटून घेत.

पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजमधून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. झाले आणि त्यांनी कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी देखील केली. त्यानंतर ते पुण्याला आले. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. आणि नंतर एम.ए. केले.

सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते लेखन आणि नाटक क्षेत्रात आले. त्यांनी अनेक नाटकांच्या कथा रचल्या. स्वतः कामही केले. त्यानंतर ते चित्रपट क्षेत्राकडे वळले. वंदे मातरम्‌, दूधभात आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांची भूमिका आहे. ‘ गुळाचा गणपती ‘ या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन अशी सर्व कामे पुलंनी स्वतः केली. 

वंदे मातरम्‌ चित्रपटात पुल व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’नाच रे मोरा’ हे गाणे खूपच प्रसिध्द झाले. १९५५ मध्ये पुल आकाशवाणी त नोकरी करू लागले. आकाशवाणी साठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहल्या. १९५८ मध्ये पु.ल. देशपांडे यांना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर “मिडिया ऑफ मास कम्युनिकेशन” या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले.

१९५९ मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते बनले. दूरदर्शन वाहिनीवर बिरजू महाराजांचा नृत्य कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचे निर्माते पुल होते. त्या कार्यक्रमात त्यांनी तबलाही वाजवला होता. दूरदर्शनच्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुल हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार पुलंना मिळालेले आहेत. मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्‌स‘ (NCPA) या संस्थेत पु.ल.देशपांडे यांनी अनेक प्रयोग केले होते. या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे कार्यक्रम सादर केले.

पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर यांनी ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या नावाचा मराठी चित्रपट काढला आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी म्हणजे १२ जुन २००० रोजी पुण्याच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. 

त्यांची काही प्रसिध्द पुस्तके –

खोगीरभरती (१९४९), नस्ती उठाठेव (१९५२), बटाट्याची चाळ (१९५८), गोळाबेरीज (१९६०), पूर्वरंग (१९६३), असा मी असामी (१९६४), व्यक्ती आणि वल्ली (१९६६), हसवणूक (१९६८), खिल्ली (१९८२), कोट्याधीश पु.ल. (१९९६), उरलं सुरलं (१९९९), पुरचुंडी (१९९९).

The post Pu la Deshpande Information in Marathi | पु. ल. देशपांडे – हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/pu-la-deshpande-information-in-marathi/feed/ 0 1574
Veer Sawarkar Information। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! https://dailymarathinews.com/veer-sawarkar-information/ https://dailymarathinews.com/veer-sawarkar-information/#respond Sat, 22 Feb 2020 10:51:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=1231 भारतीय क्रांतीकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक असे विविधरंगी व्यक्तिमत्त्व, जीवनाच्या विकासात्मक आणि वास्तववादी आयामाला स्पर्श करणारे विनायक दामोदर सावरकर हे एक परखड आणि ...

Read moreVeer Sawarkar Information। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !

The post Veer Sawarkar Information। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! appeared first on Daily Marathi News.

]]>

भारतीय क्रांतीकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक असे विविधरंगी व्यक्तिमत्त्व, जीवनाच्या विकासात्मक आणि वास्तववादी आयामाला स्पर्श करणारे विनायक दामोदर सावरकर हे एक परखड आणि ध्येयनिष्ठ व्यक्ती होते. विनायक सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ साली नाशिक जिल्ह्यातील भगूर या ठिकाणी झाला. हिंदू तत्वज्ञान स्पष्टपणे आणि विश्लेषक पद्धतीने ते मांडू शकत होते. धर्मातील कच्चे दुवे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ते जाणून होते. विज्ञानाचा पुरस्कार आणि जातिव्यवस्थेचा तिढा असणारे एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती होती.

• कौटुंबिक माहिती आणि प्रारंभिक जीवन

दामोदर सावरकर यांना तीन मुलगे होते. बाबाराव, विनायक आणि नारायण अशी तिन्ही मुलांची नावे होती. विनायक नऊ वर्षांचे असताना त्यांची आईचे निधन झाले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. वक्तृत्व आणि काव्यरचना यांत सावरकरांना लहानपणापासून रस होता. ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. स्वदेशीचा फटका, आणि स्वतंत्रतेचे स्त्रोत ह्या रचना त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी रचल्या. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच सावरकरांनी घेतलेली शपथ अजरामर ठरली. ती शपथ अशी “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.”

इ.स. १८९९ मध्ये सावरकरांच्या वडिलांचा प्लेगच्या साथीने मृत्यू झाला. मार्च १९०१ मध्ये विनायक सावरकरांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर इ.स. १९०६ साली लंडनला गेले.

• राष्ट्रभक्ती आणि जीवन कार्य –

सावरकर क्रांतिकारी विचारांनी पेटून उठले होते. कॉलेज जीवनात राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी स्थापन केली. पुढे या संघटनेचे प्रकट रूप म्हणून मित्रमेळा संघटना स्थापन केली. पागे आणि म्हसकर हे साथीदार सोबत घेऊन या संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. हीच संघटना पुढे ” अभिनव भारत ” या नावाने उदयास आली. इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांच्या विचारांचा प्रभाव सावरकरांवर होता. जोसेफ यांची संघटना “यंग इटली” च्या नावावरून “अभिनव भारत” असे नाव या संघटनेस देण्यात आले होते. विदेशी कापडांची होळी सावरकरांनी पुण्यात १९०५ मध्ये केली होती.

उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये असताना जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. अनेक युवक त्या आत्मचरित्राचा अभ्यास करत. महाराष्ट्रातील खूप मोठा तरुणवर्ग त्या भाषांतराने प्रेरित झाला होता. कित्येक जणांना तर त्याची प्रस्तावना देखील पाठ होती. लंडनला असताना इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारत संघटनेचे क्रांतिकार्य सुरू झाले होते.

बाबाराव यांना राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आली होती आणि जन्मठेपेची शिक्षा देऊन काळया पाण्यावर धाडले होते. त्याचा प्रतिशोध म्हणून मदनलाल धिंग्राने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याला लंडनमध्ये मारले आणि हसत-हसत फाशी स्वीकारली. सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य म्हणजे ‘ मदनलाल धिंग्रा.’ सावरकर आणि त्यांचे सहकारी बापट यांनी अनेक रशियन क्रांतिकारी गटांशी संपर्क वाढवत बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आणि २२ पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकी एका पिस्तुलाने १६ वर्षीय अनंत कान्हेरे याने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार केले. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या युवकांना फाशी झाली. जॅक्सनचा वाढत चाललेला अन्याय आणि बंधू बाबाराव यांना झालेला तुरुंगवास यालादेखील जॅक्सनच जबाबदार होता. या अशा कारणांनी जॅक्सनला ठार केले.

जॅक्सनला मारण्यासाठी वापरलेले पिस्तुल हे सावरकरांनीच पाठवलेले होतं याचा सुगावा लागताच ब्रिटिश सरकारने त्यांना तात्काळ अटक केली. इ. स. १९१० मध्ये समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात होते, तेव्हा मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून त्यांनी उडी मारली. पोहत पोहत ते फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पोहोचले. फ्रान्स सरकारच्या परवानगीशिवाय ब्रिटिश सरकार त्यांना पकडू शकणार नाही असा त्यांचा अंदाज होता. परंतु तसे झाले नाही आणि ब्रिटीश सरकारने त्यांना पुन्हा एकदा अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरून इ. स. १९११ मध्ये त्यांना दोन जन्मठेप म्हणजे सुमारे ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा करण्यात आली.

सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात अनेक प्रकारे छळण्यात आले. तो छळ म्हणजे सहन न करण्यासारखा होता. खूप संकटे आणि असह्य वेदना देत काळ जणू त्यांची परीक्षाच पाहत होता. असे सर्व असताना देखील त्यांनी नानाविध लेखन केले. कमला हे महाकाव्य रचले. भारतातील राजकारण बदलत होते. ब्रिटिश सरकार आपली नीती सोडून वागत होती. अशातच स्वतःचे राष्ट्र मात्र हिंदुत्ववाद सोडता कामा नये असे त्यांना मनोमन वाटत होते. ब्रिटिश कधी ना कधी सोडून जातीलच परंतु राष्ट्रातील इतर जातींचे मुजोरीपण वाढू नये आणि अखंड हिंदुत्व टिकून राहावे यासाठी ते सतत प्रयत्नशील होते.

विठ्ठल भाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारखे नेते सावरकरांची सुटका व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. अखेर स्वतःच्या काही संकल्पासाठी आणि देशहितासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या काही अटी मान्य केल्या आणि त्यांची १९२१ मध्ये अंदमान तुरुंगातून सुटका करण्यात आली.

त्यानंतर तीन वर्ष ते रत्नागिरीतील तुरुंगात होते. १९२४ मध्ये दोन अटींवर त्यांची सुटका करण्यात आली. पहिली अट म्हणजे ते रत्नागिरीत स्थानबद्ध राहतील आणि राजकारणात सक्रिय होणार नाहीत. त्यांनी या अटी मान्य करीत रत्नागिरीत आपले समाजकार्य सुरू केले. अंदमानातील क्रांतिकारी आणि लेखकी पेशा आता सामाजिक रूप घेऊ लागला होता. त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्य सुरू केले. अस्पृश्यता निवारण, त्यांचे शिक्षण, आणि समान वागणूक यासाठी ते झटले. धर्मांतर करून गेलेल्या अनेक लोकांना हिंदू धर्मात आणले. अस्पृश्यांना त्या काळी मंदिर प्रवेशबंदी होती म्हणून १९३१ साली भागोजी शेठ यांच्या मदतीने “पतितपावन” या मंदिराची स्थापना केली.

हिंदू धर्म आणि हिंदूंची व्याख्या काय? याचे विश्लेषण त्यांच्या हिंदुत्व या ग्रंथातून दिसून येते. त्यांचे विज्ञानवादी विचार अनेकांना प्रेरित करत होते. हिंदू ही जगण्याची आणि माणुसकीची पद्धत त्यांनी व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न केला. हिंदुधर्म प्रबोधन चळवळ उभी केली. अन्य परकीय भाषेचे आपल्या मायदेशातील भाषांवर होत असलेले आक्रमण सावरकरांना मान्य नव्हते. भाषाशुद्धी, लिपिशुद्धी या चळवळी देखील चालू केल्या. 

१० मे १९३७ रोजी त्यांना मुक्त करण्यात आले. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले. तेथे त्यांनी अनेक निशस्त्र लढे दिले. त्यापैकी भागानगर हा  निजामविरूध्द आणि भागलपूर हा लढा इंग्रजांविरुद्ध लढला. सशस्त्र क्रांतीचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला नव्हता. जर वेळ आली तर भारतीय तरुणांनी इंग्रजांविरुध्द लढण्यासाठी सशस्त्र तयार राहावे अशी त्यांची धारणा होती. १९३८ मध्ये ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 

त्यानंतरच्या काळात ते कवी, लेखक, समाजसुधारक म्हणून खूप प्रसिद्धीस येत होते. १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर त्यांना अत्यंत आनंद झाला होता. परंतु फाळणीनंतर झालेले अत्याचार त्यांना मान्य नव्हते. अखंड हिंदुत्ववादी विचारधारा त्यांची कायम होती. १९४७ साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचा सहभाग असू शकतो या कारणावरून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. परंतु नंतर त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. 

१८५७ चा उठाव हे केवळ एक बंड नसून तो इंग्रजांविरुद्ध योजलेली पहिली सशस्त्र लढाई होती. त्याचे साधार लेखन सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्य समर या ग्रंथात सापडते. हा ग्रंथ ब्रिटिश काळात प्रसिद्ध होऊ शकला नव्हता. सावरकरांचे मित्र कुटिन्हो यांनी त्याची प्रत सांभाळून ठेवल्यामुळे स्वातंत्र्यानंतर तो प्रकाशित झाला. अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी काही उर्दू गझला लिहल्या होत्या त्या जुलै २०१३ मध्ये सापडल्या. त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. 

त्यांची भाषाशुद्धी चळवळ खूप वाखाणण्याजोगी आहे. प्राध्यापक, मुख्याध्यापक, चित्रपट, बोलपट, दिग्दर्शक, प्राचार्य, वेशभूषा, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, क्रीडांगण, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शैक्षणिक, राजकीय, आणि चित्रपट सृष्टीला साजेसे शब्द त्यांनीच सुचवले आहेत. भारतीय घटना समितीला केलेल्या त्यांच्या सूचना देखील पाळण्यात आल्या. त्यांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे, १ – भारत हे देशाचे नाव असावे.२ – हिंदी ही राष्ट्रभाषा असावी.३ – नागरीलीपी ही राष्ट्रलीपी असावी. या सूचनांचे देखील पालन करण्यात आले. उतारवयात त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यांनी १९६६ साली प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचा निर्णय घेतला. मग २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. पूर्व प्रधानमंत्री अटलजींच्या काळात सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु ती फेटाळली गेली. 

मराठी लेखक म्हणून त्यांचे जे लिखाण आहे असे क्वचितच कोणी लिहलेले असेल. त्यांचा दर्जा आणि समज आपल्याला त्यांच्या लिखाणावरून कळते. सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते” त्यांच्या या कविता खूपच प्रसिद्ध आहेत. सावरकरांचे लेखन म्हणजे वाचकांसाठी एक जिवंत अनुभव असतो. त्यांच्या लेखनातील खालील पुस्तके तुम्ही नक्की वाचू शकता.

• संगीत उत्तरक्रिया • संगीत उ:शाप • ऐतिहासिक निवेदने • काळे पाणी • अखंड सावधान असावे • १८५७ चे स्वातंत्र्यसमर •अंदमानच्या अंधेरीतून • अंधश्रद्धा भाग १ • अंधश्रद्धा भाग २ • क्रांतिघोष • गरमा गरम चिवडा • गांधी आणि गोंधळ • जात्युच्छेदक निबंध • जोसेफ मॅझिनी • माझी जन्मठेप • माझ्या आठवणी – नाशिक • माझ्या आठवणी – पूर्वपीठिका • माझ्या आठवणी – भगूर • मोपल्यांचे बंड • तेजस्वी तारे • प्राचीन अर्वाचीन महिला • भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने • भाषा शुद्धी • महाकाव्य कमला • महाकाव्य गोमांतक • रणशिंग • लंडनची बातमीपत्रे • विविध भाषणे • विविध लेख • स्फुट लेख • हिंदुत्व • हिंदुत्वाचे पंचप्राण • हिंदुपदपादशाही • हिंदुराष्ट्र दर्शन • क्ष – किरणे • विज्ञाननिष्ठ निबंध • शत्रूच्या शिबिरात • संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष • सावरकरांची पत्रे • सावरकरांच्या कविता

The post Veer Sawarkar Information। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/veer-sawarkar-information/feed/ 0 1231
Virat Kohli Information In Marathi | विराट कोहली – ” दि मॉडर्न लेजंड ” ! https://dailymarathinews.com/virat-kohli-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/virat-kohli-information-in-marathi/#respond Thu, 20 Feb 2020 08:33:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=1319 “विराट कोहली” एक असे नाव जे भारतीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळपत आहे. स्वतःच्या फलंदाजीने पूर्ण क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारा हा फलंदाज देि मॉडर्न लेजंड ...

Read moreVirat Kohli Information In Marathi | विराट कोहली – ” दि मॉडर्न लेजंड ” !

The post Virat Kohli Information In Marathi | विराट कोहली – ” दि मॉडर्न लेजंड ” ! appeared first on Daily Marathi News.

]]>
“विराट कोहली” एक असे नाव जे भारतीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळपत आहे. स्वतःच्या फलंदाजीने पूर्ण क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारा हा फलंदाज देि मॉडर्न लेजंड नावाने प्रसिद्ध कसा झाला आणि त्याच्या या यशामागे कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत त्याचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

चिकू, किंग कोहली, रन मशीन या टोपण नावांनी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानात उतरताच सर्व क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष असतो. मूळचा दिल्लीचा रहिवासी असणारा हा फलंदाज, त्याची क्रिकेट खेळण्याची सुरुवात कशी झाली, त्याला क्रिकेट बद्दल एवढे आकर्षण आणि चिकाटी निर्माण कशी काय झाली याबद्दल अगोदर जाणून घेऊ. कोहली लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. दररोज काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा त्याला इतरांपासून थोडे वेगळे बनवते. प्रत्येक दिवशी स्वतःचा खेळ आणखी सुधारत जाणे हेच त्याचे उद्दिष्ट होते.

जन्म आणि क्रिकेटची आवड –

विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबामध्ये झाला. व्यवसायाने वकील असणाऱ्या त्याच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली आहे आणि आईचे नाव सरोज कोहली असे आहे. त्याला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. त्यांची नावे विकास आणि भावना आहेत.

कोहलीचे टोपण नाव “चिकू” आहे त्याचे हे नाव प्रशिक्षक राजीव शर्मा यांनी ठेवले आहे. लहानपणापासून चिकू हातात बॅट घेऊन वडिलांना गोलंदाजी करायला लावायचा. त्याची ही आवड ओळखून शेजाऱ्यांनी प्रेम कोहलींना, त्याला अकॅडमीत भरती करा असे सांगितले. त्याचे प्राथमिक शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये चालू होते शिवाय त्याला पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये देखील भरती करण्यात आले. अकॅडमीत त्याला प्रशिक्षक राजकुमार शर्मा उर्फ राजीव शर्मा यांचे प्रशिक्षण लाभले. ह्या व्यवसायिक क्लब मधून तो क्रिकेटचे धडे गिरवत गेला. क्रिकेटमधील जास्त सरावासाठी दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहतीमधील सेवियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.

कोहली लहानपणापासूनच हुशार आणि चपळ असल्याने तो क्रिकेटमध्ये खूपच प्रगती करत गेला. कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी मेंदूच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे निधन झाले असताना कोहलीची कसोटी क्रिकेट मॅच चालू होती. वडिलांच्या दुःखद मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी तो क्रिकेट मॅच खेळायला जाणे हे अनेक जणांना आश्चर्यचकित करणारे होते. परंतु आजचा किंग कोहली पाहता त्यावेळीही असणारे त्याचे क्रिकेटबद्दलचे वेड दिसून येते. वडिलांचा अभाव त्याला खूप जाणवतो, असे त्याने खूप वेळा नमूद केले आहे. त्याचे वडील त्याला सतत सरावासाठी घेऊन जायचे. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी क्रिकेट खेळू शकलो अशी टिप्पणी देखील तो वारंवार करत असतो.

क्रिकेट करियरचा पाया –

• २००३-०४ साली “पॉली उम्रीगर ट्रॉफी”साठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्या स्पर्धेत त्याने दोन शतके झळकावली.

• २००४-०५ मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला. त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ४७० धावा केल्या.

• २००५-०६ मध्ये दिल्लीने विजय मर्चंट ट्रॉफी जिंकली. त्या स्पर्धेत कोहली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७ सामन्यांत तीन शतकांसह ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा केल्या.

• जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही वनडे आणि कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवले.

• सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. कोहलीने या दौऱ्यात, कसोटी मालिकेत ५८ तर एकदिवसीय मालिकेत ४१.६६ च्या सरासरीने धावा केल्या.

• नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले.

• याच काळात डिसेंबर महिन्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्या वेळी निधनानंतर ही कर्नाटक विरूध्द त्याने जी ९० धावांची खेळी साकारली त्यावेळी तो खरा प्रसिद्ध झाला. त्यावेळी तो बाद झाल्यानंतर वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला.

• या घटनेनंतर तो खूप बदलला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. प्रत्येक सरावसत्र जणू मॅचप्रमाणे घेऊ लागला. त्याच आयुष्य म्हणजे क्रिकेटच अशी जाणीव त्याने त्याच्या खेळण्यातून करून दिली.

• जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा श्रीलंकेचा दौरा होता. श्रीलंका, बांगलादेश आणि भारत या तिन्ही देशांच्या त्रिकोणी मालिकेत त्याची फलंदाजी खूपच सुधारली होती. त्याच्याकडे या मालिकेत खेळपट्टीवर तग धरून धावा जमवत राहण्याचे कौशल्य आले होते.

• फेब्रुवारी-मार्च २००८ मध्ये भारतीय 19 वर्षाखालील संघाने मलेशिया येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यांत ४७च्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या. या विजेतेपदानं तर कोहली भारताचे भविष्य म्हणून उदयास येऊ लागला.

कारकिर्दीची सुरुवात –

तेंडुलकर आणि सेहवाग उपलब्ध नसल्याने सलामीवीर म्हणून विराट कोहलीने ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. सलामीच्या सामन्यात कोहली १२ धावांवर बाद झाला. उर्वरित सामन्यांत त्याने ३७, २५, ५४ आणि ३१ धावा काढल्या.

नंतर सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध भारत अ संघात त्याची निवड अनधिकृत कसोटी मालिकेसाठी झाली. त्याला एकदाच फलंदाजी मिळाली. त्या डावात त्याने ४९ धावा केल्या.

नोव्हेंबर २००८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कोहलीला निवडण्यात आले. परंतु तेंडुलकर आणि सेहवाग असल्यामुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही.

जुलै – ऑगस्ट २००८ मध्ये उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली. या स्पर्धेत त्याने ६६.३३ च्या सरासरीने सर्वाधिक ३९८ धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याने १०४ धावांची खेळी साकारली. तो सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने १७ धावांनी जिंकत विजेतेपद पटकावले.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची निवड झाली. जखमी युवराज सिंहच्या जागी तो चौथ्या क्रमांकावर खेळला. वेस्ट इंडिज विरूध्द १३० धावांचा पाठलाग करताना त्याने ७९ धावांची खेळी साकारली. या सामन्यात प्रथमच त्याने क्रिकेटमध्ये “सामनावीर” हा पुरस्कार पटकावला.

डिसेंबर २००९ मध्ये मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने पहिल्या दोन सामन्यात २७ व ५४ धावा केल्या. तिसरा सामना युवराज सिंह खेळला. पुन्हा दुखापत झाल्याने युवराज चौथा सामना खेळू शकला नाही. यावेळी कोहलीने शानदार १११ चेंडूत १०७ धावा केल्या. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक होते.

जानेवारी २०१० मध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि भारत या संघांमध्ये त्रिकोणी मालिका झाली. या मालिकेत तेंडुलकरला विश्रांती दिली गेल्याने सर्व सामने खेळण्याची संधी कोहलीला मिळाली. या मालिकेत त्याने दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले. त्याने पाच सामन्यांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा केल्या.

फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.

मे – जुन २०१० मध्ये होणाऱ्या मालिकेसाठी त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली. अनुभवी खेळाडूंना श्रीलंका, झिम्बाब्वे, भारत या संघांच्या त्रिकोणी मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. कोहलीने मालिकेत दोन अर्धशतकाच्या मदतीने ४२ च्या सरासरीने १६८ धावा केल्या. यादरम्यान तो भारतातर्फे सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.

जून २०१० मध्ये आशिया चषक स्पर्धेत कोहली फक्त १६.७५ च्या सरासरीने ६८ धावा जमवू शकला तर पुढच्याच मालिकेत म्हणजे ऑगस्ट २०१० मध्ये न्यूझीलंड, श्रीलंका आणि भारत या त्रिकोणी मालिकेत देखील त्याने फक्त १५ च्या सरासरीने धावा केल्या.

यानंतर ऑक्टोबर २०१० मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात २९० धावांचा पाठलाग करताना वैयक्तिक तिसरे शतक झळकावून कोहलीने भारताला तो सामना जिंकून दिला. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०४ चेंडूत १०५ धावांची शानदार खेळी करत कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले.

जानेवारी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या मालिकेत त्याने दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या. त्यानंतर विश्वचषक २०११ साठी १५ खेळाडूंच्या यादीत कोहलीचे देखील नाव होते.

विश्वचषक स्पर्धा म्हणजे एक स्वप्नवतच होते. कर्णधार धोनीने विराट कोहलीला नियमित खेळवले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा केल्या आणि कारकिर्दीतील ५ वे शतक झळकावले. पुढच्या पाच सामन्यांत त्याने ८, ३४, १२, १ आणि ५९ अशा धावा केल्या. पुढच्या फेरीतील ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध त्याने अनुक्रमे २४ आणि ९ धावा केल्या. हे दोन्ही सामने भारताने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. २७५ धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर तेंडुलकर आणि सेहवाग लवकर गमावल्याने गंभीर सोबत कोहलीने केलेली ८३ धावांची भागीदारी महत्वाची होती. तीच भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉइंट असल्याचे अनेक जाणकार मानतात. या भागीदारीत त्याचा ३५ धावांचा वाटा होता. हा सामना जिंकत भारताने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले.

The post Virat Kohli Information In Marathi | विराट कोहली – ” दि मॉडर्न लेजंड ” ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/virat-kohli-information-in-marathi/feed/ 0 1319
भारतीय क्रिकेटमधील भावी सुपरस्टार – यशस्वी जैस्वाल ! https://dailymarathinews.com/yashaswi-jaiswal-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/yashaswi-jaiswal-information-in-marathi/#respond Sat, 08 Feb 2020 10:09:06 +0000 https://dailymarathinews.com/?p=1402 संघर्ष करून कित्येक जण यशस्वी होतात तर कित्येक जण त्या संघर्षापासून पळ काढतात. संघर्षमय आयुष्य असावेच असे काही जण मानतात. त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर उन्नत होत ...

Read moreभारतीय क्रिकेटमधील भावी सुपरस्टार – यशस्वी जैस्वाल !

The post भारतीय क्रिकेटमधील भावी सुपरस्टार – यशस्वी जैस्वाल ! appeared first on Daily Marathi News.

]]>
संघर्ष करून कित्येक जण यशस्वी होतात तर कित्येक जण त्या संघर्षापासून पळ काढतात. संघर्षमय आयुष्य असावेच असे काही जण मानतात. त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर उन्नत होत जाते. तर जे परिस्थितीशी दोन हात न करता आरामशीर किंवा निवांत आयुष्य सुरुवातीला जगतात त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर अधोगती प्राप्त करते व ते दुःखी बनतात. आज स्वतःच्या जीवनाची खरी प्रगती संघर्षामुळेच झाली असल्याची जाणीव यशस्वी जैस्वालला होत असेल. एक सक्षम, कणखर, जिद्दी आणि मेहनती वृत्तीचा क्रिकेटपटू ” यशस्वी जैस्वाल ” याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

यशस्वीचे मूळ गाव उत्तरप्रदेशमधील, भदोही जिल्ह्यातील सुरियावा हे आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत ७ वर्षाचा असताना त्याचे वडील आणि तो मुंबईला येतात. लहानपणी मुंबईत वरळी परिसरात आपल्या चुलत्याच्या घरी यशस्वी राहत असतो. परंतु तिथे राहायला पुरेशी जागा नसल्याने यशस्वी पुढे कालबादेवी परिसरात असणाऱ्या एका डेअरीत तो राहू लागतो. तिथे तो कामही करायचा आणि राहायचा देखील ! क्रिकेटमधील कौशल्य ओळखून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली खरी, परंतु परिस्थिती काहीच अनुकूल नव्हती. ज्या डेअरीमध्ये तो राहायचा तिथे काम करणेदेखील अपेक्षित होते. दिवसभर क्रिकेट खेळल्यानंतर तो थकून जायचा अशातच डेअरीमध्ये काम करणे त्याला जड जाऊ लागले नंतर त्याला तेथून दुसरीकडे राहण्यासाठी जावे लागले. दोन वेळचे खाणे नीट नशिबात नसताना आई वडील कोणी सोबत नसताना त्याची ही वाटचाल सुरू होती. अत्यंत कष्टप्रद जीवन तो जगत होता.

दुसरीकडे राहण्याची आणि खाण्याची सोय जर करायची असेल तर कामाला पर्याय नाही परंतु क्रिकेटवर असलेल्या प्रेमाखातर तो थेट पोहचतो आझाद मैदानात ज्या मैदानाला मुंबई क्रिकेटची नर्सरी समजले जाते. तिथे तो मुस्लिम यूनाइटेड क्लबच्या ग्राउंड्समैन सोबत टेंट मध्येच राहू लागला. मात्र तिथे झोपण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय होण्यामागे एक अट होती. तिथे त्याला जेवण बनवताना मदत करावी लागे आणि राहण्यासाठी दिवसभर उत्तम क्रिकेट खेळावे लागे. अशा दोन अटी तो नेहमी पूर्ण करत असे. परिस्थितीला दोष न देता अत्यंत कठीण वेळ त्याने पाहिली परंतु त्यातून देखील मार्ग काढत तो क्रिकेट खेळतच राहिला.

त्याचे वडील काही रक्कम घरून पाठवत असत परंतु त्यामध्ये सर्व खर्च भागवणे अवघड होते. गरज पडल्यास तो क्रिकेट व्यतिरिक्त मैदानातील इतर काम देखील करायचा किंवा क्रिकेट सामन्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःच्या गरजा पूर्ण करत असे. एवढ्या लहान वयात त्याची संपूर्ण जबाबदारी त्याने स्वतःनेच घेतली होती. या सर्व संघर्षामुळे त्याच्यात कमालीची प्रगल्भता येत होती. त्याचाच प्रत्यय त्याच्या खेळीतून येत असे. मानसिक कणखरपणा आणि संयम हे दोन गुण त्याला चांगलेच अवगत झालेले होते.

जगण्यासाठी आणि क्रिकेटसाठी आता पैसे लागणार होते. त्याने पाणीपुरीच्या गाड्यावर काम करायला सुरुवात केली. तेथून त्याला चांगलेच पैसे मिळत होते. रामलीला असताना त्याची भरपूर कमाई होत असे. त्याचे क्रिकेट मधील इतर मित्र आणि खेळाडू कधी पाणी पुरीच्या गाड्यावर येऊ नये असे त्याला वारंवार वाटत असे. त्यांनी हे बघितल्यावर काय म्हणतील या कारणास्तव त्याला थोडा कमीपणा वाटत असे. परंतु मित्रांना ही गोष्ट समजते आणि त्याचे सर्व मित्र आनंदाने त्या गाड्यावर पाणीपुरी खाण्यासाठी जात असत. असे सर्व असतानादेखील त्याने क्रिकेट सोडले नाही. यशस्वीचे स्वप्न भारतासाठी क्रिकेट खेळणे हे होते. त्याने त्याच्या सरावात कधीही कमतरता येऊ दिली नाही.

कशी निखरली प्रतिभा –

आझाद मैदानावर सराव करत असताना कोच ज्वाला सिंह यांची नजर यशस्वीवर पडली. उत्तरप्रदेशमधीलच गोरखपूर येथून मुंबई येथे अडीच दशक वर्षांपूर्वी ज्वाला सिंह आलेले असतात. त्यांना या मुलाचा संघर्ष खूपच भावतो. स्वतःप्रमाणेच हा मुलगादेखील क्रिकेटमध्ये भविष्य घडवू पाहत आहे. याचा सार्थ अभिमान बाळगत ज्वाला सिंह त्याला फ्री ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतात. येथून यशस्वीची प्रतिभा उजळण्यास सुरुवात होते. जून २०१८ मध्ये श्रीलंकेविरूध्द त्याला १९ वर्षाखालील भारतीय संघात स्थान मिळते. पहिल्या दोन सामन्यात त्याला अपयश मिळाल्यानंतर नंतरच्या दोन्ही सामन्यात त्याला वगळले जाते. पुन्हा ५ व्या सामन्यात निवड झाल्यानंतर शानदार शतक झळकावत भारतासाठी तो सामना आणि मालिका जिंकून देतो.

यानंतर इंग्लंड आणि आशिया चषक या दोन्ही मालिकेमध्ये दमदार प्रदर्शन करत त्याने स्वतःचे नाव सार्थक ठरवले. यानंतर विजय हजारे ट्रॉफी मध्ये त्याने झारखंड विरूध्द एकदिवसीय सामन्यात मुंबईकडून खेळताना द्विशतक झळकावले आहे. हे द्विशतक झळकवल्यानंतर तो खरा प्रकाशझोतात आला. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत त्याचे प्रदर्शन चांगले झाले आहे. त्याने उपांत्य फेरीत पाकिस्तानविरूध्द खेळलेल्या सामन्यात शतक झळकावत सामना एकतर्फी भारताला जिंकून दिला.

संघर्षाला खूप महत्त्व आहे. आहे ती परिस्थिती घेऊन त्यावर रडत बसणे किंवा ती बदलणे असे दोन पर्याय नेहमी खुले असतात. परिस्थिती बदलण्याचा पर्याय सुरुवातीला खूप कष्टप्रद असल्याने आणि सुखाने आराम करण्यात काहीच नुकसान होत नाही असे वरवरचे वाटत असल्याने कोणीच संघर्षासाठी तयार नसते. कोणीच सुरुवातीला दुःख झेलण्यासाठी तयार नसते. परंतु हा संघर्षाचा मार्ग ज्यांनी निवडला त्यांच्या आयुष्याचं चीज झाल्याखेरीज राहत नाही. त्याप्रमाणेच यशस्वीही स्वतःचा मार्ग निवडत आणि संघर्ष करत आत्तापर्यंत यशस्वी ठरला आहे. त्याप्रमाणेच इथून पुढे देखील चांगले प्रदर्शन करत त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळावी अशीच सर्वांची इच्छा!

The post भारतीय क्रिकेटमधील भावी सुपरस्टार – यशस्वी जैस्वाल ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/yashaswi-jaiswal-information-in-marathi/feed/ 0 1402