Vidyarthi Ani Mobile Nibandh Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 02 Oct 2022 11:09:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Vidyarthi Ani Mobile Nibandh Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 विद्यार्थी आणि मोबाईल (फायदे) – मराठी निबंध २ | Vidyarthi Ani Mobile Nibandh 2 https://dailymarathinews.com/student-and-mobile-benefits-marathi-essay-2-vidyarthi-ani-mobile-nibandh-2/ https://dailymarathinews.com/student-and-mobile-benefits-marathi-essay-2-vidyarthi-ani-mobile-nibandh-2/#respond Sun, 02 Oct 2022 11:06:21 +0000 https://dailymarathinews.com/?p=5025 विदयार्थ्यांना असणाऱ्या शंकांचे समाधान हे मोबाईलमुळे सहजशक्य कसे काय झालेले आहे, अशा आशयाचे स्पष्टीकरण या निबंधात करण्यात आलेले आहे.

The post विद्यार्थी आणि मोबाईल (फायदे) – मराठी निबंध २ | Vidyarthi Ani Mobile Nibandh 2 appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा विद्यार्थी आणि मोबाईल (Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

आजच्या विद्यार्थ्यांना मोबाईल हा वरदानच ठरत आहे. त्यांना असणाऱ्या शंकांचे समाधान हे मोबाईलमुळे सहज शक्य कसे काय झालेले आहे, अशा आशयाचे स्पष्टीकरण या निबंधात करण्यात आलेले आहे.

विद्यार्थी आणि मोबाईल – फायदे | Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi |

विद्यार्थ्यांना मोबाईल फोनचा खऱ्या अर्थाने फायदा व उपयोग हा कोरोना काळात झाला. ऑनलाईन तासिका आणि ऑनलाईन शिक्षणाच्या उद्देशाने सर्व पालकांनी आपल्या पाल्य विद्यार्थ्यांना मोबाईल विकत घेऊन दिलेले होते. त्यानंतर विद्यार्थी अभ्यासासाठी मोबाईलचाच जास्त वापर करू लागले.

शाळेतील सर्व शिक्षण हे सध्या ऑनलाईन देखील उपलब्ध असल्याने विद्यार्थी मोबाईल सातत्याने हाताळू लागलेत. विद्यार्थी अभ्यासातील समस्या व प्रश्नांची उत्तरे मोबाईलवरूनच मिळवू लागलेत. यूट्यूब, गूगल तसेच अन्य शैक्षणिक मोबाईल ॲप्लिकेशन्स व वेबसाइट्सची मदत विद्यार्थी सहजरित्या घेऊ लागलेत.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून अनेक शैक्षणिक संस्था या ऑनलाईन शिक्षणसुद्धा उपलब्ध करून देऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे मोबाईलच्या वापराने विद्यार्थी घरबसल्या कला, क्रीडा, शालेय, तांत्रिक अशा कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकत आहेत.

सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून उत्तर मिळवणे शक्य नसते. मोबाईलमुळे मात्र अभ्यासावेळी न समजलेली एखादी संकल्पना ही विद्यार्थ्यांना सहज समजत आहे. तीच संकल्पना विद्यार्थी वारंवार मोबाईलमधून समजून घेऊ शकत असल्याने त्यांचा अभ्यास हा सहजशक्य व तणावमुक्त झालेला आहे.

मोबाईलचा वापर हा इंटरनेटमुळे आणखीनच सोयीस्कर झालेला आहे. विद्यार्थी जगभरातील विविधता ऑनलाईन पाहू शकतात. सोशल मीडिया, ऑनलाईन सेवा व सुविधा, ऑनलाईन बँकिंग अशा विविध बाबींचा वापर विद्यार्थी लहान वयातच करू लागलेत. विद्यार्थ्यांची तांत्रिक शिक्षणाची गरज मोबाईलमुळे सहज पूर्ण होत आहे.

मोबाईल आणि इंटरनेटमुळे कारकिर्दीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांना कामाची माहिती लहान वयातच होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, कोडींग, डिजिटल मार्केटिंग अशी कारकिर्दीची निर्माण झालेली क्षेत्रे विद्यार्थ्यांसाठी मोबाईलमुळे खुली झालेली आहेत.

एक आभासी दुनिया आणि त्यातील नकली वावर हेच उद्याचे भविष्य आहे. सोशल मीडिया त्यादिशेने पाऊले उचलत आहे. विद्यार्थी जर मोबाईल हाताळू लागले तर त्यांनाही भविष्यात होणारे तांत्रिक बदल आत्ताच समजतील. मानवी जीवनात तंत्रज्ञान कसे काय बदल घडवून आणत आहे, याचीही प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना होऊ शकेल.

सध्याचे युग हे माहिती युग आहे, असे म्हटले जाते. मोबाईलमुळे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही माहिती मिळवू शकतात. त्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडत आहे. सखोल ज्ञान व विस्तारित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्यास सोप्पे झाले आहे.

विद्यार्थ्यांचे ध्यान हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा मोबाईलच्या वापरावेळी लक्षात घ्यावा लागेल. मोबाईलच्या माध्यमातून ज्या सुविधा व सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलचे नकळत व्यसन जडत आहे. काही विद्यार्थी मोबाईल अतिप्रमाणात वापरत आहेत.

मोबाईलच्या अतिवापराने मात्र विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शारिरीक व मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थी हे स्वकेंद्री बनत आहेत. मोबाईलचा प्रमाणात वापर केला आणि आरोग्याची योग्य काळजी घेतली तर मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर अशी वस्तू ठरू शकेल.

तुम्हाला विद्यार्थी आणि मोबाईल हा मराठी निबंध (Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post विद्यार्थी आणि मोबाईल (फायदे) – मराठी निबंध २ | Vidyarthi Ani Mobile Nibandh 2 appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/student-and-mobile-benefits-marathi-essay-2-vidyarthi-ani-mobile-nibandh-2/feed/ 0 5025
विद्यार्थी आणि मोबाईल – मराठी निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh https://dailymarathinews.com/vidyarthi-ani-mobile-marathi-essay-vidyarthi-ani-mobile-nibandh/ https://dailymarathinews.com/vidyarthi-ani-mobile-marathi-essay-vidyarthi-ani-mobile-nibandh/#respond Sat, 01 Oct 2022 13:01:55 +0000 https://dailymarathinews.com/?p=5022 मोबाइलचा अतिवापर हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम घडवून आणत आहे. त्यामुळे अभ्यासाविषयी एक उदासीनता निर्माण झालेली आहे.

The post विद्यार्थी आणि मोबाईल – मराठी निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा विद्यार्थी आणि मोबाईल (Vidyarthi Ani Mobile) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. आजच्या विद्यार्थ्यांचा वेळ हा अभ्यास आणि मोबाईल यामध्ये विभागला गेला आहे.

मोबाइलचा अतिवापर हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम घडवून आणत आहे. त्यामुळे अभ्यासाविषयी एक उदासीनता निर्माण झालेली आहे. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात घडत असलेले बदल या निबंधात स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

विद्यार्थी आणि मोबाईल निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi |

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज प्रत्येकजण सहजरित्या मोबाईल वापरत आहे. अगदी २०१९ पर्यंत बहुतांश विद्यार्थी मोबाईल वापरत नसत, परंतु कोरोना काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईलचा प्रवेश झाला. कोरोनाचा प्रभाव कमी झाला परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचे अस्तित्व मात्र वाढतच गेले.

विद्यार्थी सुरुवातीला ऑनलाईन तास, ऑनलाईन अभ्यास अशा निमित्ताने मोबाईल हाताळत होते. तेव्हा शिक्षणही ऑनलाईन होते, परंतु आता शाळा सुरू झाल्याने ऑनलाईन शिक्षण कमी झाले. तेव्हा अभ्यासासाठी हाताळत असलेला मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी कधी व्यसन बनून गेला हे कळालेच नाही.

विद्यार्थ्यांसाठी शारिरीक हालचाल आणि मैदानी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांची मानसिक व शारिरीक वाढ ही खेळाच्या निमित्ताने होत असते. परंतु मोबाईल वापरत असल्याने विद्यार्थी आता फक्त ऑनलाईन खेळ खेळू लागलेत. त्यामध्ये त्यांचा खूप सारा वेळ वाया जात आहे.

ऑनलाईन खेळ, सोशल मीडिया आणि वेबसीरीज अशा प्रकारच्या मनोरंजनामुळे विद्यार्थी हे आततायी बनू लागलेत, लगेच रागावू लागलेत, भावनिक नियंत्रण हरवू लागलेत. तसेच मानसिक स्थैर्य लहान वयात नसताना हिंसा, प्रेम, क्रोध, घृणा अशा भावना ते अनुभवू पाहतायेत.

मोबाईलचा वापर हा इंटरनेटमुळे अत्यंत सोयीस्कर झालेला आहे. विद्यार्थी देखील मोठ्या लोकांप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करत आहेत. स्वतःची ऑनलाईन प्रोफाइल त्यांना अत्यंत महत्त्वाची वाटत आहे. स्वकेंद्री व एका आभासी दुनियेत त्यांचा वावर वाढत आहे. त्यांचे ध्यान आता फक्त मोबाईलमध्येच खिळून राहिलेले आहे.

दहा – पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा स्मार्टफोन अस्तित्वात नव्हते तेव्हाचे विद्यार्थी हे खूप साऱ्या इतर कार्यांत स्वतःला आजमावून पाहत होते. शारिरीक श्रम देखील करत होते. त्यामुळे मानसिक व शारिरीक स्थैर्य त्यांच्या जीवनात सहज निर्माण होत होते. मोबाईलमुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये तशी कल्पकता व समरसता दिसून येत नाही.

आजच्या काळात विद्यार्थी हा मोबाईलवरच सर्व वेळ खर्च करत आहे. त्यामुळे डोळे, मान, मेंदू, पाठ, त्वचा अशा अवयवांना धोका निर्माण होत आहे. शारिरीक हालचाल कमी झाल्याने विद्यार्थी लगेच थकत आहेत. बौध्दिक काम त्यांना नकोसे वाटू लागले आहे. अशाने हेच विद्यार्थी भविष्यात जीवनाप्रती असंवेदनशील बनतील.

कारकीर्द व शैक्षणिक प्रगती अशा बाबी या निरर्थक वाटू लागलेल्या आहेत. काही अपवादात्मक विद्यार्थी आहेत जे घवघवीत यश प्राप्त करत आहेत मात्र संवेदना हरवलेले विद्यार्थी हे जास्त प्रमाणात आहेत. विद्यार्थ्यांचे आयुष्य हे मोबाईलने व्यापलेले असल्याने स्क्रीन व्यतिरिक्त इतरत्र ध्यान देणे हे त्यांच्यासाठी अवघड जात आहे.

मोबाईलला शाळेत बंदी असतानाही विद्यार्थी चोरून चोरून मोबाईल वापरत आहेत. अगदी लहान वयात ऑनलाईन स्टेटस निर्माण करू पाहणे, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणे, फॉलोअर्स, सबस्क्राईबर्स वाढवणे यातच विद्यार्थ्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे. जीवनात भरारी घेण्याच्या तरुण वयात विद्यार्थी हे भरकटत चाललेले आहेत.

मोबाईलचा अतिवापर ही विद्यार्थ्यांसाठी फक्त वैयक्तिक समस्या नाही तर ती भविष्यात सामाजिक समस्या देखील असणार आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे जबाबदार नागरिक असणार आहेत. त्यांनी स्वतःची जबाबदारी जर घेतली नाही तर नक्कीच ते भविष्यातील सामाजिक स्थिरतेसाठी घातक ठरतील.

तुम्हाला विद्यार्थी आणि मोबाईल हा मराठी निबंध (Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post विद्यार्थी आणि मोबाईल – मराठी निबंध | Vidyarthi Ani Mobile Nibandh appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/vidyarthi-ani-mobile-marathi-essay-vidyarthi-ani-mobile-nibandh/feed/ 0 5022