छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 28 Jan 2021 23:49:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 छत्रपती शिवाजी महाराज निबंध | Shivaji Maharaj Marathi Nibandh | https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-marathi-nibandh/ https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-marathi-nibandh/#comments Wed, 13 Jan 2021 23:59:38 +0000 https://dailymarathinews.com/?p=1942 छत्रपती शिवाजी महाराज निबंध (Shivaji Maharaj Marathi Nibandh) लिहताना त्यांची ओळख, त्यांच्या जीवनातील घटना, त्यांचे लोकहित कार्य मुद्देसूद स्वरूपात वर्णन करायचे असते. तसेच शून्यातून निर्माण ...

Read moreछत्रपती शिवाजी महाराज निबंध | Shivaji Maharaj Marathi Nibandh |

The post छत्रपती शिवाजी महाराज निबंध | Shivaji Maharaj Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
छत्रपती शिवाजी महाराज निबंध (Shivaji Maharaj Marathi Nibandh) लिहताना त्यांची ओळख, त्यांच्या जीवनातील घटना, त्यांचे लोकहित कार्य मुद्देसूद स्वरूपात वर्णन करायचे असते. तसेच शून्यातून निर्माण केलेले स्वराज्य, आलेल्या संकटांचा धैर्याने केलेला सामना आणि त्यांचा रयतेकडून राजा छत्रपती म्हणून झालेला स्वीकार अशा सर्व बाबींचा उल्लेख देखील निबंधात करायचा असतो.

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले (Chhatrapati Shivajiraje Shahajiraje Bhosale) हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आणि विश्वाला आदर्शवत असे राजे आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित निबंध लिहताना प्रत्येक व्यक्ती तसेच विद्यार्थी आनंदाने आणि अभिमानाने भरून जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज या विषयवार निबंध लिहताना खालील मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण करू शकता.

• ओळख आणि प्रस्तावना
• शिवरायांचे बालपण व शिक्षण
• आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग
• राज्यकारभार आणि विस्तार
• राज्याभिषेक
• जीवन निष्कर्ष

छत्रपती शिवाजी महाराज – मराठी निबंध | Shivaji Maharaj Essay In Marathi |

स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शहाजीराजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते.

शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते. बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते.

माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत. त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत.

शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होता. त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली.

आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. त्यांनतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.

“अफजलखान वध”, “शायीस्ते खानाची बोटे कापणे” या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.

शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने! प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले.

इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.

शिवाजीराजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते. तसेच स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजी राजे सफल झाले होते. आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने आणि पराक्रमाने “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे.

शिवरायांचे अखंड कर्तृत्व निबंध स्वरूपात मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध (Shivaji Maharaj Marathi Nibandh) तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.

The post छत्रपती शिवाजी महाराज निबंध | Shivaji Maharaj Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-marathi-nibandh/feed/ 1 1942